शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बारामती येथे हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:34 IST

कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने बारामती येथे कांदा फुकट वाटला.

ठळक मुद्देअनोखे आंदोलन : स्वेच्छेने ग्राहकांनी दिलेले पैसे पाठवणार मोदी आणि फडणविसांनाकांद्यासाठी माझा एकरी ४५ हजार रूपये खर्चपंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर अभिनंदन’ असा उपरोधिक मजुकूर

बारामती : कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने हवालदिल झालेल्या बारामती येथे शेतकऱ्याने कांदा फुकट वाटला. कांदा नेणाऱ्यांनी स्वेच्छेने दान पेटीत पैसे टाका. हे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवण्यात येणार आहेत. असा फलक याठिकाणी लावून या शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध केला आहे. बारामती नगरपालिकेसमोर जैनकवाडी येथील तरूण शेतकरी दिनेश नामदेव काळे यांनी आपल्या श्रेयश व प्रसाद या दोन मुलांसह नागरिकांना कांदा फुकट वाटला. दिनेश काळे म्हणाले, जैनकवाडी परिसरात माझे अडीच एकर क्षेत्र आहे. दीड एकरामध्ये मी कांद्याची लागवड केली. दीड एकरात १५० बॅग कांदा झाला. त्यापैकी १२० बॅग कांद्याची कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये केवळ १२ हजार रूपयांमध्ये विक्री केली. कांद्यासाठी माझा एकरी ४५ हजार रूपये खर्च झाला आहे. मात्र एकरातील कांद्याचे केवळ १२ हजार रूपये आले. त्यामुळे राहिलेला दीड टन कांदा आता नागरिकांना फुकट वाटत आहे. स्वेच्छेने काही नागरिकांनी पैसे दिले तर ते पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे. शासनाला शेतकऱ्याची खरी अवस्था कळावी यासाठी फुकट कांदा वाटत आहे, असे काळे यांनी सांगितले.  काळे यांनी लावलेल्या फलकावर ‘शेतकरी बांधवांना मागील ४ वर्षांपासून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आपल्यावर खुश आहोत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहिर अभिनंदन’ असा उपरोधिक मजुकूर देखील लिहला आहे. तर दिनेश यांच्या सोबत ८ वीत शिकणारा त्यांचा मोठा मुलगा श्रेयश व सहावीत शिकणारा लहान मुलगा प्रसाद देखील शाळेचा दिवस बुडवून वडिलांना मदत करत होते. दरम्यान, कांदा फुकट विक्रीसाठी मांडल्याचे लक्षात आल्यानंतर याठिकाणी या शेतकऱ्याची विचारपुस करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. उत्पादन व उत्पन्न यातील तफावत समजुन घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन गंभीर नसल्याचीही चर्चा याठिकाणी रंगली होती. काही नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन त्यांच्या अनोख्या आंदोलनाना आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच अनेकांना कांदा घेऊन जात दानपेटीमध्ये पैसेही टाकले. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीGovernmentसरकार