शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

नोटाबंदीने फळांचे भाव गडगडले

By admin | Updated: November 16, 2016 02:59 IST

पुरंदर तालुका सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब आदी फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सीताफळ, अंजीर, पेरू यांचा हंगाम मोठ्या प्रमाणात आहे.

नारायणपूर : पुरंदर तालुका सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब आदी फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या सीताफळ, अंजीर, पेरू यांचा हंगाम मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी सीताफळाचे, पेरूचे उत्पादन वाढल्याने पुरंदरची बाजारपेठ असलेल्या सासवडच्या फळबाजारात फळांची आवक साधारणच होत आहे. मात्र सध्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.बाजारात याच नोटा मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत याच नोटा घेण्यास भाग पाडत आहेत. नाईलाजाने शेतकऱ्यांना याच नोटा घ्याव्या लागत आहेत. सासवड बाजारपेठ असल्याने तालुक्यातील बहुतेक शेतकरी याठिकाणी आपला माल विक्रीस आणत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बाजारात मोठी आवक झाल्याने सीताफळाचे बाजारभाव कमी झाले आहेत. हे दर पुन्हा पूर्वपदावर येत नाहीत तोपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याठिकाणी शेतकऱ्यांना थेट माल विकता येत असल्याने शेतकरी पुणे, मुंबईपेक्षा याच ठिकाणी माल विकणे पसंत करतात. कारण याठिकाणी दलालाची गरज नसल्याने शेतकऱ्यांना हा पर्याय परवडत आहे. सुटे पैसे नसल्याचे कारण देत व्यापारी माल घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.(वार्ताहर)