शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मंचरला महामार्ग मोकळा व प्रशस्त, कारवाईनंतरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:36 IST

शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता मोकळा व प्रशस्त झाला आहे. समोरील वाहन सहजपणे दिसून येते. महामार्गाने आता मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे.

मंचर - शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता मोकळा व प्रशस्त झाला आहे. समोरील वाहन सहजपणे दिसून येते. महामार्गाने आता मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. काल रात्री मंचर ग्रामपंचायत इमारतीसमोर असलेले पत्र्याचे आच्छादन शेड काढून टाकण्यात आले. या वेळी भाडेकरू व्यावसायिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली.येथील महामार्गालगतची अतिक्रमणे धडक कारवाई करून काढण्यात आली. बारा तास चालेलल्या कारवाईत ३५० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला होता.नंदकुमार पेट्रोलपंप ते जीवन मंगल कार्यालय यादरम्यानची अतिक्रमणे काढण्यात आल्याने महामार्ग आता प्रशस्त वाटूलागला आहे. रस्त्यालगतचे फलक गॅसकटरने तोडून ते बाहेर नेऊन टाकण्यात आले. त्यामुळे अडथळेदूर झाले आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनांना दूरवरचे सहजदिसू लागल्याने अपघातांना आळा बसणार आहे.एसटी बसस्थानक मोकळेझाले आहे. फेरीवाले, फळविक्रेते यांना हटविण्यात आल्याने प्रवेशद्वार मोकळे झाले आहे. मोठे फलक काढण्यात आल्यानंतर आतील एसटी बस बाहेरून सहज दिसू लागल्या आहेत. बसस्थानकाच्या बाहेर असणारे पोलीस मदत केंद्रसुद्धा अतिक्रमणात येत होते. त्याची जागा बदलून मदत केंद्र आता बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरू होणार आहे.पिंपळगाव फाटा, बाजार समिती, तसेच बसस्थानकासमोर व साळी हॉस्पिटलसमोर अतिक्रमणे निघाल्याने वाहतूककोंडी होणार नाही.अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी भरारी पथक नेमले जाणार आहे. हे पथक पुढे अतिक्रमण झाले, की ते लगेच काढून टाकणार आहे.पुढील टप्प्यात मंचर-घोडेगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.शिवाजी चौकात असलेल्या ग्रामपंचायत इमारतीमधील तळमजल्यावरील गाळे विविध व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. या व्यावसायिकांनी समोर पत्र्याचे शेड उभारले होते. सरपंच दत्ता गांजाळे व प्रशासनाने हे शेड रात्री काढून टाकले. त्या वेळी काही व्यावसायिकांनी विरोध दर्शविला होता. शाब्दिक चकमक उडाली. मात्र पत्र्याचे शेड काढण्याची ठाम भूमिका सरपंच दत्ता गांजाळे यांनी घेतल्यानंतर रात्री उशिरा हे अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईचे स्वागत सर्वच स्तरांतून केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणे