शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला महामार्ग मोकळा व प्रशस्त, कारवाईनंतरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:36 IST

शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता मोकळा व प्रशस्त झाला आहे. समोरील वाहन सहजपणे दिसून येते. महामार्गाने आता मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे.

मंचर - शहरातील पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता मोकळा व प्रशस्त झाला आहे. समोरील वाहन सहजपणे दिसून येते. महामार्गाने आता मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरारी पथक नेमण्यात येणार आहे. काल रात्री मंचर ग्रामपंचायत इमारतीसमोर असलेले पत्र्याचे आच्छादन शेड काढून टाकण्यात आले. या वेळी भाडेकरू व्यावसायिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली.येथील महामार्गालगतची अतिक्रमणे धडक कारवाई करून काढण्यात आली. बारा तास चालेलल्या कारवाईत ३५० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला होता.नंदकुमार पेट्रोलपंप ते जीवन मंगल कार्यालय यादरम्यानची अतिक्रमणे काढण्यात आल्याने महामार्ग आता प्रशस्त वाटूलागला आहे. रस्त्यालगतचे फलक गॅसकटरने तोडून ते बाहेर नेऊन टाकण्यात आले. त्यामुळे अडथळेदूर झाले आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनांना दूरवरचे सहजदिसू लागल्याने अपघातांना आळा बसणार आहे.एसटी बसस्थानक मोकळेझाले आहे. फेरीवाले, फळविक्रेते यांना हटविण्यात आल्याने प्रवेशद्वार मोकळे झाले आहे. मोठे फलक काढण्यात आल्यानंतर आतील एसटी बस बाहेरून सहज दिसू लागल्या आहेत. बसस्थानकाच्या बाहेर असणारे पोलीस मदत केंद्रसुद्धा अतिक्रमणात येत होते. त्याची जागा बदलून मदत केंद्र आता बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरू होणार आहे.पिंपळगाव फाटा, बाजार समिती, तसेच बसस्थानकासमोर व साळी हॉस्पिटलसमोर अतिक्रमणे निघाल्याने वाहतूककोंडी होणार नाही.अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी भरारी पथक नेमले जाणार आहे. हे पथक पुढे अतिक्रमण झाले, की ते लगेच काढून टाकणार आहे.पुढील टप्प्यात मंचर-घोडेगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.शिवाजी चौकात असलेल्या ग्रामपंचायत इमारतीमधील तळमजल्यावरील गाळे विविध व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. या व्यावसायिकांनी समोर पत्र्याचे शेड उभारले होते. सरपंच दत्ता गांजाळे व प्रशासनाने हे शेड रात्री काढून टाकले. त्या वेळी काही व्यावसायिकांनी विरोध दर्शविला होता. शाब्दिक चकमक उडाली. मात्र पत्र्याचे शेड काढण्याची ठाम भूमिका सरपंच दत्ता गांजाळे यांनी घेतल्यानंतर रात्री उशिरा हे अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईचे स्वागत सर्वच स्तरांतून केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणे