शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चौथ्या दिवशी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:18 IST

तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. 

ठळक मुद्देजेरबंद बिबट्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथे निवारा केंद्रात

निमोणे : शिरूर तालुक्यातील निमोणे येथे वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये अखेर चौथ्या दिवशी बिबट्या जेरबंद झाला असून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र अद्यापही या भागात दुसऱ्या बिबट्यांचा वावर असल्याने या भागात आणखी पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी युवा कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. निमोणे (ता. शिरूर) येथील इनाम परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेकांना या बिबट्यांनी दर्शन दिल्याने त्यांची पाचावर धारण बसली होती. या भागातील शेळ्या आणि कुत्री यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरात मोठे दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे स्थानिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी त्वरित हालचाली करून या भागात ५ मे रोजी विठ्ठल काळे यांच्या शेतात पिंजरा लावला. तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गायकवाड, नियत क्षेत्र अधिकारी बी. एम. दहातोंडे, वनकर्मचारी संपत पाचुंदकर व नवनाथ गांधिले यांनी जेरबंद बिबट्या ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथे निवारा केंद्रात करण्यात आली.अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने, शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेला एकट्याने फिरू नये, हातात काठी व उजेडासाठी टॉर्च असावा, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावीत, फटाक्यांचा आवाज करावा, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.

 

टॅग्स :Shirurशिरुरleopardबिबट्याforest departmentवनविभाग