शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून कऱ्हेचे बंधारे कोरडे  : पावसाने फिरवली पाठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:32 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही.

ठळक मुद्देनाझरे व पुरंदर उपसाचेही पाणी सोडण्याची मागणी

काऱ्हाटी  : कऱ्हा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे चार वर्षांपासून कोरडे ठणठणीत आहेत. नाझरे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरंदर उपसाचे पाणी सोडून बंधारे तातडीने भरण्याची मागणी नदीकाठच्या गावातून केली आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागासाठी शासनाने आंबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी हायस्कूल, जगतापवस्ती, जळगाव कडेपठार, लोणकरवस्ती, कदम वस्ती,कऱ्हा वागज, बऱ्हाणपूर, अशा अनेक भागांत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून या भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीला त्याचा फायदा झाला. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भागवण्यास मदत झाली. मात्र, सलग चार वर्षांपासून या भागात अत्यल्प पडणारा पाऊस व या बंधाऱ्यात पावसाव्यतिरिक्त कुठलेही पाणी येत नसल्यामुळे हे बंधारे कायमच कोरडे ठणठणीत आहेत.बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पावसाळ्यातदेखील पाऊस पडला नाही. मात्र, या भागाच्या दक्षिण व  उत्तर दिशेला  वाहणारी नीरा व भीमा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या भागातून जाणारी कऱ्हा नदी मात्र कोरडी ठणठणीत आहे. अशाच वेळी पुरंदर उपसा व जानाई शिरसाई उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून बंधारे  भरण्याची  गरज आहे. मात्र या भागाचं वास्तव्य  शासन दरबारी कोणी मांडत आहेत, की  नाही, या भागाचे लोकप्रतिनिधी  नक्की काय करत आहेत, असा परखड सवाल काºहाटी येथील शेतकरी शिवाजी वाबळे यांनी बोलताना व्यक्त केले. 

सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.  अशा वेळी पुरंदर उपसा योजनेतून पाणी कºहा नदीमध्ये सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरावेत अन्यथा रिमझिम पावसाच्या जोरावर केलेल्या शेतातील पिकांचे  पाण्यावाचून मोठे नुकसान होणार आहे. पिके वाचविण्यासाठी नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींकडून पाटबंधारे खात्याला तोंडी मागणी केली मात्र त्याचा उपयोग होत नसल्याने आता लेखी पत्र देऊन  मागणी करणार आहे.- बी. के. जाधव, सरपंच

टॅग्स :BaramatiबारामतीriverनदीRainपाऊस