शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:25 IST

शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे.

विशाल शिर्के ।पुणे : शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात होणा-या मातामृत्यूपेक्षा अत्याधुनिक आरोग्यसेवा असलेल्या शहरातील मातामृत्यूचे प्रमाण चौपट आहे.गर्भारपणातील मृत्यू, प्रसूतीदरम्यान झालेला आणि प्रसूतीनंतर ३२ आठवड्यांच्या आत संबंधित मातेचा मृत्यू झाल्यास त्याला मातामृत्यू मानण्यात येतो. राज्यात २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत १ हजार ९८६ मातांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्र वगळून राज्यात यवतमाळ जिल्ह्यात २०१३ ते २०१६-१७ या चार वर्षांमध्ये तब्बल १४७ मातांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये २०१६-१७ मध्ये ६० हजार १०५ प्रसूती झाल्या होत्या, त्यापैकी १ हजार ९२७ सरकारी आणि खासगी रुग्णालयात ३ हजार ८९५ सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याच वर्षात येथे २७ मातांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.शहरातील गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास प्रत्येक वर्षी सरासरी पन्नासहून अधिक मातांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात वर्षांत २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ५३ मातामृत्यूंची नोंद शहरात झाली आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास २०१३-१४ मध्ये ६६,४१७, तर १४-१५ मध्ये ६५,९९१ आणि १५-१६ मध्ये ६५,०३२ प्रसूती झाल्या. तसेच १६-१७ यावर्षी ७४,१४२ प्रसूतीची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्या तुलनेत मातामृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ११, १४, १० आणि ९ इतके आहे. शहरातील अत्याधुनिक सुविधा असूनदेखील पन्नास हजार प्रसूतीमागील मातामृत्यूचा आकडा चक्रावून टाकणारा आहे.रक्तस्राव, बाळंतपणात आलेले झटके, घरातील अस्वच्छतेमुळे अथवा संबंधित रुग्णालयातील चुकीच्या हाताळणीमुळे झालेला जंतूसंसर्ग, बाळाचे डोके मोठे असणे,रक्तक्षय, उच्च रक्तदाब अशाविविध कारणांमुळे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. बाळंतपणात मातेची वारंवार तपासणी केली पाहिजे. हिमोग्लोबिन, रक्तदाब याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ््या अथवा लस घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.> महाराष्ट्रात लाखामागे ६८ बालमृत्यूदेशात सर्वांत कमी मातामृत्यू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. लाखामागे राज्यात ६८ बालमृत्यू होतात. केरळ असून, त्यांचे प्रमाण लाखामागे ६१ ते ६२ इतके आहे.यापूर्वी २००९ ते २०११ या काळात राज्यातील मातामृत्यूचे प्रमाण ८७ इतके होते. रक्तक्षय, जंतूसंसर्ग ही एक महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विभागाच्या १०८ या क्रमांकावर महिलांना याबाबत संपूर्ण मदत मिळते.>साल एकूण प्रसूती मातामृत्यू२०१०-११ ४८,३६८ ३७२०११-१२ ५३,०२४ ४३२०१२-१३ ५०,२९० ६४२०१३-१४ ५३,६९६ ५३२०१४-१५ ५१,४४३ ६६२०१५-१६ ४६,४५२ ५३२०१६-१७ ५०,७०० ४९आॅगस्ट २०१७ २१,७५१ २३>ग्रामीण भागातील रुग्णालयात एखाद्या महिलेला काही वैद्यकीय अडचण उद्भवल्यास तिला शहरातील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे येथील मातामृत्यूचा आकडा अधिक दिसत आहे. पूर्वी वाहतुकीच्या तितक्याशा सोयी नसल्याने शहरातील रुग्णालयात आणताना वाटेतच मातेचा मृत्यू झाल्याच्या घटना व्हायच्या. त्यात घट झाली आहे.- डॉ. मीनाक्षी देशपांडे, सहसचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

टॅग्स :Deathमृत्यू