शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:25 IST

शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे.

विशाल शिर्के ।पुणे : शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात होणा-या मातामृत्यूपेक्षा अत्याधुनिक आरोग्यसेवा असलेल्या शहरातील मातामृत्यूचे प्रमाण चौपट आहे.गर्भारपणातील मृत्यू, प्रसूतीदरम्यान झालेला आणि प्रसूतीनंतर ३२ आठवड्यांच्या आत संबंधित मातेचा मृत्यू झाल्यास त्याला मातामृत्यू मानण्यात येतो. राज्यात २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत १ हजार ९८६ मातांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्र वगळून राज्यात यवतमाळ जिल्ह्यात २०१३ ते २०१६-१७ या चार वर्षांमध्ये तब्बल १४७ मातांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये २०१६-१७ मध्ये ६० हजार १०५ प्रसूती झाल्या होत्या, त्यापैकी १ हजार ९२७ सरकारी आणि खासगी रुग्णालयात ३ हजार ८९५ सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याच वर्षात येथे २७ मातांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.शहरातील गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास प्रत्येक वर्षी सरासरी पन्नासहून अधिक मातांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात वर्षांत २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ५३ मातामृत्यूंची नोंद शहरात झाली आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास २०१३-१४ मध्ये ६६,४१७, तर १४-१५ मध्ये ६५,९९१ आणि १५-१६ मध्ये ६५,०३२ प्रसूती झाल्या. तसेच १६-१७ यावर्षी ७४,१४२ प्रसूतीची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्या तुलनेत मातामृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ११, १४, १० आणि ९ इतके आहे. शहरातील अत्याधुनिक सुविधा असूनदेखील पन्नास हजार प्रसूतीमागील मातामृत्यूचा आकडा चक्रावून टाकणारा आहे.रक्तस्राव, बाळंतपणात आलेले झटके, घरातील अस्वच्छतेमुळे अथवा संबंधित रुग्णालयातील चुकीच्या हाताळणीमुळे झालेला जंतूसंसर्ग, बाळाचे डोके मोठे असणे,रक्तक्षय, उच्च रक्तदाब अशाविविध कारणांमुळे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. बाळंतपणात मातेची वारंवार तपासणी केली पाहिजे. हिमोग्लोबिन, रक्तदाब याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ््या अथवा लस घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.> महाराष्ट्रात लाखामागे ६८ बालमृत्यूदेशात सर्वांत कमी मातामृत्यू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. लाखामागे राज्यात ६८ बालमृत्यू होतात. केरळ असून, त्यांचे प्रमाण लाखामागे ६१ ते ६२ इतके आहे.यापूर्वी २००९ ते २०११ या काळात राज्यातील मातामृत्यूचे प्रमाण ८७ इतके होते. रक्तक्षय, जंतूसंसर्ग ही एक महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विभागाच्या १०८ या क्रमांकावर महिलांना याबाबत संपूर्ण मदत मिळते.>साल एकूण प्रसूती मातामृत्यू२०१०-११ ४८,३६८ ३७२०११-१२ ५३,०२४ ४३२०१२-१३ ५०,२९० ६४२०१३-१४ ५३,६९६ ५३२०१४-१५ ५१,४४३ ६६२०१५-१६ ४६,४५२ ५३२०१६-१७ ५०,७०० ४९आॅगस्ट २०१७ २१,७५१ २३>ग्रामीण भागातील रुग्णालयात एखाद्या महिलेला काही वैद्यकीय अडचण उद्भवल्यास तिला शहरातील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे येथील मातामृत्यूचा आकडा अधिक दिसत आहे. पूर्वी वाहतुकीच्या तितक्याशा सोयी नसल्याने शहरातील रुग्णालयात आणताना वाटेतच मातेचा मृत्यू झाल्याच्या घटना व्हायच्या. त्यात घट झाली आहे.- डॉ. मीनाक्षी देशपांडे, सहसचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

टॅग्स :Deathमृत्यू