शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:25 IST

शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे.

विशाल शिर्के ।पुणे : शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात होणा-या मातामृत्यूपेक्षा अत्याधुनिक आरोग्यसेवा असलेल्या शहरातील मातामृत्यूचे प्रमाण चौपट आहे.गर्भारपणातील मृत्यू, प्रसूतीदरम्यान झालेला आणि प्रसूतीनंतर ३२ आठवड्यांच्या आत संबंधित मातेचा मृत्यू झाल्यास त्याला मातामृत्यू मानण्यात येतो. राज्यात २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत १ हजार ९८६ मातांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्र वगळून राज्यात यवतमाळ जिल्ह्यात २०१३ ते २०१६-१७ या चार वर्षांमध्ये तब्बल १४७ मातांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये २०१६-१७ मध्ये ६० हजार १०५ प्रसूती झाल्या होत्या, त्यापैकी १ हजार ९२७ सरकारी आणि खासगी रुग्णालयात ३ हजार ८९५ सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याच वर्षात येथे २७ मातांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.शहरातील गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास प्रत्येक वर्षी सरासरी पन्नासहून अधिक मातांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात वर्षांत २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ५३ मातामृत्यूंची नोंद शहरात झाली आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास २०१३-१४ मध्ये ६६,४१७, तर १४-१५ मध्ये ६५,९९१ आणि १५-१६ मध्ये ६५,०३२ प्रसूती झाल्या. तसेच १६-१७ यावर्षी ७४,१४२ प्रसूतीची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्या तुलनेत मातामृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ११, १४, १० आणि ९ इतके आहे. शहरातील अत्याधुनिक सुविधा असूनदेखील पन्नास हजार प्रसूतीमागील मातामृत्यूचा आकडा चक्रावून टाकणारा आहे.रक्तस्राव, बाळंतपणात आलेले झटके, घरातील अस्वच्छतेमुळे अथवा संबंधित रुग्णालयातील चुकीच्या हाताळणीमुळे झालेला जंतूसंसर्ग, बाळाचे डोके मोठे असणे,रक्तक्षय, उच्च रक्तदाब अशाविविध कारणांमुळे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. बाळंतपणात मातेची वारंवार तपासणी केली पाहिजे. हिमोग्लोबिन, रक्तदाब याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ््या अथवा लस घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.> महाराष्ट्रात लाखामागे ६८ बालमृत्यूदेशात सर्वांत कमी मातामृत्यू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. लाखामागे राज्यात ६८ बालमृत्यू होतात. केरळ असून, त्यांचे प्रमाण लाखामागे ६१ ते ६२ इतके आहे.यापूर्वी २००९ ते २०११ या काळात राज्यातील मातामृत्यूचे प्रमाण ८७ इतके होते. रक्तक्षय, जंतूसंसर्ग ही एक महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विभागाच्या १०८ या क्रमांकावर महिलांना याबाबत संपूर्ण मदत मिळते.>साल एकूण प्रसूती मातामृत्यू२०१०-११ ४८,३६८ ३७२०११-१२ ५३,०२४ ४३२०१२-१३ ५०,२९० ६४२०१३-१४ ५३,६९६ ५३२०१४-१५ ५१,४४३ ६६२०१५-१६ ४६,४५२ ५३२०१६-१७ ५०,७०० ४९आॅगस्ट २०१७ २१,७५१ २३>ग्रामीण भागातील रुग्णालयात एखाद्या महिलेला काही वैद्यकीय अडचण उद्भवल्यास तिला शहरातील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे येथील मातामृत्यूचा आकडा अधिक दिसत आहे. पूर्वी वाहतुकीच्या तितक्याशा सोयी नसल्याने शहरातील रुग्णालयात आणताना वाटेतच मातेचा मृत्यू झाल्याच्या घटना व्हायच्या. त्यात घट झाली आहे.- डॉ. मीनाक्षी देशपांडे, सहसचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

टॅग्स :Deathमृत्यू