शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता टोळ यांचे निधन

By श्रीकिशन काळे | Updated: April 19, 2024 19:37 IST

ते २००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते...

पुणे : ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ (८९) यांचे पुण्यात शुक्रवारी निधन झाले. ते खासकरून लहान मुलांसाठी लेखन करत असत. त्यांनी अमरेंद्र दत्त असे टोपण नाव वापरून लेखन केले. ते २००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. तसेच नातू फाउंडेशनचेही विश्वस्त होते.  

मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी दत्ता टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली होती. गुरूचे आणि स्वत:चे पहिले नाव एकत्र करून ‘अमरेंद्र दत्त’ या नावाने त्यांचे साहित्य प्रकाशित केले. अमरेंद्र गाडगीळ या आपल्या गुरूंच्या स्मृती जपल्या जाव्यात तसेच, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टोळ यांनी हा निर्णय घेतला होता.

टोळ विपुल साहित्य प्रसिध्द आहे. अंक मोजू या, अच्च्या अन्‌ बच्चा, अट्टी गट्टी फू, अमृतपुत्र विवेकानंद, असे होते नामदार गोखले, आपले बापू, आम्ही जिंकलो, आळशांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजककथा, उपेक्षित मने, एक मन एक रूप (पुरस्कारप्राप्त पुस्तक), एक होते चक्रमपूर, एका वेड्याने अनेकदा (कथासंग्रह), ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट (कादंबरी, सहलेखक : अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जय मृत्युंजय, जादूची करामत, जादू संपली (कादंबरी), जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्य कथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादुर शास्त्री, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराष्ट्राचा महापुरुष-जोतिबा फुले, महाराष्ट्राचे मानकरी, मुलगा पाहिजे (प्रौढांसाठी एकांकिका), मुलांसाठी पंचतंत्र, मुलांसाठी हितोपदेश, मृत्यंजयाचा बाजीराव, मृत्युंजयाच्या कथा, येरे येरे पैशा, लिंबू नाना टिंबू नाना, लोकांचा राजा शाहू महाराज (सहलेखक : अशोक आफळे), विवेकानंद, विज्ञान गंमत कथा, शंखनाद राक्षसांचा डोंगर, शहाणपणाच्या गोष्टी, शांतिदूत शास्त्रीजी, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव (एकांकिका), सतेजकथा, संस्कारकथा, साहसी मुले, स्वर्गासाठी सहल, हे मृत्युंजय ही त्यांची पुस्तक संपदा प्रसिध्द झाली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड