शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माजी राज्यमंत्री विजय शिवतारेंच्या कुटुंबातील कलह चव्हाट्यावर; मुलीची फेसबुकवर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 12:55 IST

पत्नीने फेसबुक लाइव्ह करत फेटाळले आरोप; मानसिक तणावातून हृदयविकाराचा झटका

जेजुरी (जि. पुणे) : शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल केला आहे. पत्नी आणि मुलांसोबत असलेल्या वादातून शिवतारे यांची ही अवस्था झाल्याचा आराेप त्यांच्या कन्या ममता शिवतारे-लांडे यांनी केला आहे. मात्र, मुलीच्या या आरोपानंतर शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी खुलासा केला असून, ते गेल्या २७ वर्षांपासून कुटुंबांपासून वेगळे एका महिलेसोबत राहत असल्याचे म्हटले आहे.

ममता शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ममता या पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी फेसबुकवरून त्यांची व्यथा मांडली.

यापूर्वीही कित्येक वर्षे असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र, कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. कारण, यामुळे माझे भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाला हानी पोहचेल असे त्यांना वाटत होते व आजही वाटते. प्रकृती गंभीर असताना मोठा भाऊ सतत धमक्या देऊन त्यांना मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलिसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही.

आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय आणि विनस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून घेण्यासाठी त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. मी स्वत: डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा देत पूर्णवेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला.

मंदाकिनी शिवतारे यांनी म्हटले आहे की, २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. ममताने विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. उज्ज्वला बागवे या महिलेसोबत त्यांनी लग्न केले होते. त्यानंतर मीनाक्षी पटेल नावाच्या महिलेसोबत ते पवईला राहतात. यात संपत्तीचा वाद नाही.

... मग बाबांची संपत्ती का घेतली?  

११९४ साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य त्या आज २७ वर्षांनंतर का आठवाव्यात? असा सवाल करून ममता लांडे यांनी म्हटले आहे की, बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला? बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली? 

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेना