शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

चित्रपटांना भुलल्या अन् त्या चौघी मुंबईला पळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटांमधून निर्माण झालेले आकर्षण आणि शाळा बंद असल्याने घरात बसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटांमधून निर्माण झालेले आकर्षण आणि शाळा बंद असल्याने घरात बसून होणारे वाद या कारणांमुळे एकाच वेळी वारज्यातील ४ अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्याने खळबळ उडाली होती. वारजे पोलिसांनी घेतलेल्या शोधात या मुली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे सापडल्या. रविवारी दुपारी चारपासून सुरु झालेला शोध सुमारे ८ तासांच्या शोधानंतर रात्री साडेबारा वाजता संपला. या मुली सुखरुप सापडल्याने सर्वांनीच नि:श्वास सोडला.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात घरात बसून मोबाईलवर चित्रपट पाहताना मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. त्यातच घरात बसून राहावे लागत असल्याने मोठ्यांकडून होत असलेला राग-राग यामुळे या मुली व्यथित झाल्या. एकाच इमारतीत राहणाऱ्या १२ ते १४ वर्षांच्या या मुली रविवारी (दि. १०) दुपारी घरातून निघून गेल्या. त्यामुळे वारज्याच्या म्हाडा वसाहतीत एकच खळबळ उडाली.

मुलींच्या पालकांनी वारजे पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी यातील गांभीर्य लक्षात घेऊन मुलींच्या तपासाचे आदेश दिले. मुलींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर त्या स्वारगेट येथे गेल्याचे लक्षात आले. स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या मुली मुंबईला जाणाऱ्या ‘एसटी’त बसल्याचे दिसले. त्या पनवेलला उतरुन दुसऱ्या बसने दादरला गेल्या. तेथून त्या टॅक्सी करुन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल येथे पोहोचल्या.

वारजे पोलिसांना त्यांचे ‘लोकेशन’ मिळताच त्यांनी ही बाब लोहमार्ग पोलिसांना कळविली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात शोध घेतला असताना तेथे या मुली आढळून आल्या. त्यांनी मुलींना पोलीस ठाण्यात आणले. सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेवते, पोलीस उपनिरीक्षक मनोहर भोईणे व त्यांचे सहकारी तातडीने मुंबईला गेले व त्यांनी मुलींना ताब्यात घेऊन पुण्यात आणले.

चौकट

सावज बनण्यापूर्वीच

घरातून निघून जाण्याबाबत विचारले असता या मुलींनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात घरी बसून मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटांमुळे मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. घरात सतत होणाऱ्या वादांचा परिणामही त्यांच्यावर होत होता. त्यामुळे त्यांनी एकत्र मुंबईला जाण्याचे ठरवले. मुंबई गाठण्यासाठी त्यांनी घरातून साधारण ४ हजार रुपये घेतले होते. मुंबईत जाऊन काही कामधंदा करण्याचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे या मुली कोणाचेही सावज न ठरता सुखरुपपणे घरी परतू शकल्या.