शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आंबेगाव तालुक्यात वनविभागाची मनमानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:32 IST

आदिवसीच्या हक्कांवर गदा आणत वनांचे सभोवताली बंदिस्त कुंपण घालण्याचे काम

ठळक मुद्देकुंपणाचे काम त्वरीत थांबविण्यासाठी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांची भेटवनविभागाची ही कृती आदिवासी समाजाला कायद्याने दिलेल्या हक्कांवर अतिक्रमण अनुसूचित क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक

पुणे : आंबेगाव तालुक्यातील मौजे तिरपाड ग्रामपंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या राखीव वनाला बंदिस्त कुंपण घालण्याचे काम वन विभागाकडून सुरु आहे. यामुळे या गावातील कोळी महादेव समाजाच्या लोकांवर उपजिविका करण्याचा मोठी समस्या निर्माण झाली असून,  पेसा कायद्यातर्गत अशा पध्दतीने ग्रामपंचायतींच्या परवानगीशिवाय कुंपण घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. परंतु, सध्या वन विभागाकडून मनमानी कारभार सुरु असून,  घालण्याचे काम त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.      पुणे जिल्ह्यात आंबागेव व जुन्नर तालुक्यात राष्ट्रपती यांनी घोषित केलेले अनुसूचित क्षेत्र आहे. या क्षेत्रास पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेसा क्षेत्रातील आदिवासीच्या ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तसेच वनहक्क कायदा २००६ मधील कलम ३(१) मध्ये वन निवासी अनुसूचित जमाती किंवा पारंपारीक वननिवासी यांना प्राप्त झालेले हक्क नमुद करण्यात आले आहेत. अनुसूचित क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना आंबेगाव तालुक्यातील तिरपाड ते आहुपे या पट्ट्यात येणाऱ्या गावांतील आदिवासी समुदायाला वनात गौणवन संकलन, औषधी वनस्पती संवर्धन व जतन,जनावरांना चराई व घरगुती वापरासाठी इंधन म्हणून वाळलेली लाकडे गोळा करणे यासाठी वनप्रवेश बंदी करण्यात येत आहे. वनविभागाची ही कृती आदिवासी समाजाला कायद्याने दिलेल्या हक्कांवर अतिक्रमण असून, आदिवासींना बेदखल करण्याची सुरुवात आहे. यामुळे वनविभागाला कुंपण घालण्याचे काम तातडीणे थांबविण्याचे आदेश देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.---------------वन विभागाचा मनमानी कारभार थांबवाअनुसूचित क्षेत्रात राज्यपाल यांचे प्रशासकीय नियंत्रण असते. घटनेच्या पाचव्या अनुसूची नुसार काढलेली अधिसूचना बंधनकारक आहे. याला न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकत नाही. या अधिसूचनेतही ग्रामसभेची मंजुरीचा स्पष्ट उल्लेक असताना वन विभागाने ग्रामपंचायतीची मान्यता न घेता मनमानी पध्दतीने काम सुरु केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना स्पष्ट कळविण्यात आले असून, जिल्हा दंडाधिकारी म्हणून वन खात्यास काम थाबविण्याचे आदेश द्यावेत- सीताराम जोशी, आदिवासी  समाज कृती समिती

टॅग्स :ambegaonआंबेगावforest departmentवनविभाग