शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आंबेगाव तालुक्यात वनविभागाची मनमानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:32 IST

आदिवसीच्या हक्कांवर गदा आणत वनांचे सभोवताली बंदिस्त कुंपण घालण्याचे काम

ठळक मुद्देकुंपणाचे काम त्वरीत थांबविण्यासाठी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांची भेटवनविभागाची ही कृती आदिवासी समाजाला कायद्याने दिलेल्या हक्कांवर अतिक्रमण अनुसूचित क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक

पुणे : आंबेगाव तालुक्यातील मौजे तिरपाड ग्रामपंचायतीच्या हद्दीलगत असलेल्या राखीव वनाला बंदिस्त कुंपण घालण्याचे काम वन विभागाकडून सुरु आहे. यामुळे या गावातील कोळी महादेव समाजाच्या लोकांवर उपजिविका करण्याचा मोठी समस्या निर्माण झाली असून,  पेसा कायद्यातर्गत अशा पध्दतीने ग्रामपंचायतींच्या परवानगीशिवाय कुंपण घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. परंतु, सध्या वन विभागाकडून मनमानी कारभार सुरु असून,  घालण्याचे काम त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.      पुणे जिल्ह्यात आंबागेव व जुन्नर तालुक्यात राष्ट्रपती यांनी घोषित केलेले अनुसूचित क्षेत्र आहे. या क्षेत्रास पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार पेसा क्षेत्रातील आदिवासीच्या ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तसेच वनहक्क कायदा २००६ मधील कलम ३(१) मध्ये वन निवासी अनुसूचित जमाती किंवा पारंपारीक वननिवासी यांना प्राप्त झालेले हक्क नमुद करण्यात आले आहेत. अनुसूचित क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना आंबेगाव तालुक्यातील तिरपाड ते आहुपे या पट्ट्यात येणाऱ्या गावांतील आदिवासी समुदायाला वनात गौणवन संकलन, औषधी वनस्पती संवर्धन व जतन,जनावरांना चराई व घरगुती वापरासाठी इंधन म्हणून वाळलेली लाकडे गोळा करणे यासाठी वनप्रवेश बंदी करण्यात येत आहे. वनविभागाची ही कृती आदिवासी समाजाला कायद्याने दिलेल्या हक्कांवर अतिक्रमण असून, आदिवासींना बेदखल करण्याची सुरुवात आहे. यामुळे वनविभागाला कुंपण घालण्याचे काम तातडीणे थांबविण्याचे आदेश देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.---------------वन विभागाचा मनमानी कारभार थांबवाअनुसूचित क्षेत्रात राज्यपाल यांचे प्रशासकीय नियंत्रण असते. घटनेच्या पाचव्या अनुसूची नुसार काढलेली अधिसूचना बंधनकारक आहे. याला न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकत नाही. या अधिसूचनेतही ग्रामसभेची मंजुरीचा स्पष्ट उल्लेक असताना वन विभागाने ग्रामपंचायतीची मान्यता न घेता मनमानी पध्दतीने काम सुरु केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना स्पष्ट कळविण्यात आले असून, जिल्हा दंडाधिकारी म्हणून वन खात्यास काम थाबविण्याचे आदेश द्यावेत- सीताराम जोशी, आदिवासी  समाज कृती समिती

टॅग्स :ambegaonआंबेगावforest departmentवनविभाग