शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिधा पत्रिकेवर धान्य व दैनंदिन गरजेच्या गोष्टी उपलब्ध कराव्यात ;आपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 10:23 IST

कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. 

पुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या बंदी कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतील. त्यांच्यासाठी शिधा पत्रिकेवर किमान २० किलो.गहू तांदूळ व अन्य पदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, नोकरदार मध्यमवर्गीय कुटुंबांकडे किमान काही साठा असतो. मात्र हातावर पोट असणारे त्याबाबत काहीच करू शकत नाहीत. त्यांचे या काळात बरेच हाल होणार आहेत. ते होऊ नयेत यासाठी त्यांना किमान दरात शिधापत्रिकेवर काही ऊपलब्ध होईल याची व्यवस्था सरकारने करावी. त्यातून त्यांना निदान खाण्यासाठी काहीतरी मिळेल. ही सुविधा तातडीने सुरू केलीत तर असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, छोटे व्यावसायिक व गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येणार नाही आणि ते राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन घरी थांबू शकतील. त्याचा फायदा साथ थांबण्यासाठी होऊ शकेल असे किर्दत म्हणाले. समाजातील एक मोठा वर्ग या बंदीत होरपळून निघत आहे. घरात काही खायला नसेल तर मोठ्यांसह मुलाबाळांचेही हाल होतात. त्यांना सहजपणे अन्नधान्य ऊपलब्ध झाले तर ते किमान आपला स्वाभिमान टिकवून ठेवू शकतील. त्यामुळे सरकारने त्वरीत यात लक्ष घालावे अशी मागणी किर्दत यांनी केली. पुण्यातच असे काही लाख लोक असून ते सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAam Admi partyआम आदमी पार्टी