शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

निर्बंध पाळा अन्यथा कडक लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यात निर्बंध लागू केले असतानाही नागिरकांकडून त्याचे पालन केले जात नाही. अद्यापही वेळ गेली नसून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्यात निर्बंध लागू केले असतानाही नागिरकांकडून त्याचे पालन केले जात नाही. अद्यापही वेळ गेली नसून, शासनाने लागू केलेले निर्बंध पाळा. अन्यथा लॉकडाऊन अधिक कडक करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.16) रोजी पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सोमवारी विभागीय आयुक्तांना ससूनच्या डॉक्टरासंदर्भात बैठक घेण्यास सांगितली आहे. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्य करावे, सरकार म्हणून काम करणारे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारण न आणता कोरोनाबाधितांचा जीव जाणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पवार म्हणाले, रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानींसोबत मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनबाबत चर्चा केलीय, व्हेंटिलेटरसंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे.

सर्वांना रेमडेसिविर देण्याची गरज नाही

रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत पवार म्हणाले, सर्वांना रेमडेसिविर देण्याची गरज नाही. परंतु, अनेक डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना गरज नसतानाही रेमडेसिविर इंजेक्शन आणायला सांगतात. याचे उदाहरण सांगताना ते म्हणाले, एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा भाचा रुग्णालयात होता. त्याला रेमडेसिविरची गरज नव्हती. मात्र तरीही डॉक्टरांनी त्याला सांगितले इंजेक्शन घ्यायलाच हवे. तुझे मामा वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्यामार्फत ते मिळवा.

----

महाआघाडी सरकार स्थिरच

महाआघाडी सरकार सुरुवातीपासूनच स्थिर सरकार असून, कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. जोपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे आहेत या सरकारला तोपर्यंत किंचितसुद्धा काहीही होत नाही.

------

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

- पुण्यात ऑक्सिजन बेड वाढवण्याची आवश्यकता

- मुकेश अंबानींनी ऑक्सिजन देण्याचं आश्वासन

- निधीची कमतरता कमी पडू देणार नाही

- रेमडेसिविरचा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू