शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

लोककला विद्यापीठाला मिळेना अद्याप मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:51 PM

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : लोककलांच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी लोककला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चार वर्षांपूर्वी केली होती. लोककलावंतांची तसेच जाणकारांची समिती स्थापन करुन याबाबतचा अहवालही तयार करण्यात आला होता. मात्र, चार वर्षांनंतरही लोककला विद्यापीठ स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कला केंद्र अथवा अध्यासनाच्या माध्यमातून शासन दुधाची तहान ताकावर भागवत असल्याची तीव्र नाराजी लोककलावंतांकडून  दवण्यातयेत आहे.

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे. लोककलांनी प्राचीन काळापासून लोकानुरंजनाचे, प्रबोधनाचे कार्य केले. काळ बदललला, मनोरंजनाची साधने बदलली आणि लोककला लोप पावण्याची भीती निर्माण झाली. लोककला जपल्या जाव्यात, त्यांचा विकास व्हावा, यासाठी लोककलावंत आपापल्या क्षमतेप्रमाणे झटत आहेत. मात्र, शासनाच्या माध्यमातून प्रयत्न झाल्यास आणि लोककला विद्यापीठ उभे राहिल्यास भविष्यात या कलांचे जतन आणि संवर्धन होऊ शकेल.

सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शाहीर अमर शेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोककला विद्यापीठाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची घोषण २०१५ साली केली होती. लोककला विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रम, योग्य व्यक्तींची नेमणूक याबाबतचा प्रस्ताव लोककलावंतांच्या समितीतर्फे सांस्कृतिक विभागाकडे सुपूर्त करण्यात आला होता. मात्र, चार वर्षे उलटून गेल्यानंतरही शासनातर्फे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय लोककला संमेलनामध्ये संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी शासनाला याबाबतची आठवणही करुन दिली होती. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमातही याबाबतचा ठराव मांडण्यात आला.

‘लोकमत’शी बोलताना दादा पासलकर म्हणाले, ‘लोककला विद्यापीठाच्या कार्यक्रमाबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला होता. विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी लोककलावंतांच्या समिती गठित करावी, विद्यापीठावर योग्यव्यक्तीची नेमणूक व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी किमान दहावी उत्तीर्ण अशी शिथिल अट ठेवावी. शिक्षकांची नेमणूक करताना पदवीधर किंवा डॉक्टरेटप्राप्त व्यक्ती असावी असा आग्रह न धरता प्रत्यक्ष अनुभव असलेल्या  ककलावंतांनाप्राधान्य मिळणे आवश्यक आहे. लोककला हा पुस्तकातून शिकण्याचा विषय नसून, प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे.’ 

सांस्कृतिक विभागाने लोककलांबाबत गांभीर्याने विचार करणे आणि त्यादृष्टीने कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. आमच्या मागण्यांचा केवळ गाजराच्या पुंगीसारखा वापर केला तर लोककला टिकणार कशा? महाराष्ट्रभर लोककलेचे जागरण करणा-या व्यक्ती आहेत. लोककलांचे संवर्धन व्हावे यासाठी समाजाची, शासनाची आणि माध्यमांची साथ गरजेची आहे.- शाहीर दादा पासलकरसर्व लोककला या लोकाभिमुख आहेत. त्यामुळे लोककलावंत हे लोकपीठ आहेत. त्यांचा शरीरभाव मनोरंजनाचा असला तरी, आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलावंत ही विशारद पदवी मिळाली पाहिजे. कारण, लोककला आणि मराठी भाषा यामुळे आपण नटलो आहोत. पण, आपण लोकपरंपरा विसरत आहोत. लोककलेचा आत्मा प्रबोधनाचा असल्यामुळे ती टिकविण्याचीजबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी लोककला विद्यापीठाची नितांत गरज आहे. - डॉ. रामचंद्र देखणे,संत साहित्याचे अभ्यासक