शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

बेकायदा भरावांमुळे पूरस्थिती

By admin | Updated: September 20, 2015 00:34 IST

मावळात राष्ट्रीय महामार्गासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अनधिकृत भराव व बेकायदेशीर बांधकामे यांमुळेच मावळ तालुका शुक्रवारी पाण्याखाली गेला होता़

- विशाल विकारी,  लोणावळामावळात राष्ट्रीय महामार्गासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अनधिकृत भराव व बेकायदेशीर बांधकामे यांमुळेच मावळ तालुका शुक्रवारी पाण्याखाली गेला होता़लोणावळ्यापासून देहूरोडपर्यंत सर्वत्र रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मातीचे व मुरमाचे भराव करून जागा रस्त्याच्या उंचीच्या करण्याचा सपाटा सुरू आहे़ हे करत असताना पावसाचे नैसर्गिक नाले व ओढे काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी वळविण्यात आले आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचणी होत असून, मोठा पाऊस झाल्यास पाणी सर्रास रस्त्यावर येऊ लागले आहे़ शहरी भाग असो वा ग्रामीण भाग, मागील दशक-दीड दशकापासून मावळातील जमिनींना सोन्याचे भाव आल्याने अनेकांनी आलिशान बंगले बांधले आहेत़ ते बांधण्यास कोणाचा आक्षेप नाही. मात्र, हे बंगले बांधताना मोठ्या प्रमाणात भराव करण्यात येतो. यामुळे परिसरातील पाणी अडले जाणार नाही, याची मात्र कोठेही खबरदारी घेतली जात नाही़ सध्या रस्त्याच्या दुतफर् ा हॉटेल व धाब्यांची स्पर्धा सुरू आहे़ शासनाची कसलीही परवानगी न घेता सर्रास राष्ट्रीय महामार्गापर्यंत भराव करण्यात आल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत़ अनेक धनिकांनी डोंगरभाग व रस्त्याच्या कडेला जागा घेऊन सीमाभिंत बांधल्याने पाण्याला अडथळा निर्माण झाले आहेत़ रस्त्याच्या कडेची भातशेती धोक्यात आली आहे़ अनेक वेळा या विषयावर आवाज उठविल्यानंतरही महसूल यंत्रणा जागी होत नाही. भराव व अनधिकृत बांधकामे राजरोसपणे उभी राहत असताना आर्थिक लालसेपोटी महसुलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शेवटच्या शिपायापर्यंत सर्वच जण मूग गिळून गप्प बसतात. यामुळे मावळात अनधिकृत भराव व बांधकामांचे पेव वाढले आहे़ याचा परिणाम मात्र सर्वांनाच भोगावा लागतो आहे़मावळ तालुक्यात सरासरी दीडशे ते दोनशे इंच पाऊस मावळात पडतो़ शुक्रवारी मावळातील कामशेत विभागात दिवसभरात झालेला १४० मिमी पाऊस, कार्ला विभाग ११८ मिमी, लोणावळा विभाग ९० मिमी व शिवली विभागातील ११० मिमी पावसाने मावळातील बहुतांश अंतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग व रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे, याला कोण जबाबदार आहे? याचा काळजीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे़ महसूल विभागाने तातडीने बेकायदेशीरपणे भराव करणाऱ्यांवर कारवाई करत पाण्याचे मार्ग मोकळे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे़मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असताना दर वर्षी पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व पाण्याच्या मोऱ्यांची सफ ाई केली जायची. तसेच रस्त्यांच्या कडेने दुतफर् ा पाणी वाहून नेण्यासाठी चर केले जायचे. मात्र, हा रस्ता देखभाल दुरुस्तीकरिता आयआरबी कंपनीच्या ताब्यात दिल्यानंतर आयआरबी कंपनीकडून ही कामे झाली नाहीत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील याकडे लक्ष न दिल्याने रस्त्यांच्या मोऱ्या बंद होऊन मावळातील रस्त्यांवर पाणी चढले असल्याचे जाणकारांनी सांगितले़