शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल कंपनीत पाच कामगार भाजले

By admin | Updated: November 13, 2016 04:16 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील कारगिल इंडिया कंपनीत शनिवार (दि. १२) रोजी दुपारच्या सुमारास कंपनीतील पाच कामगार भाजले. ही घटना कशी घडली

दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील कारगिल इंडिया कंपनीत शनिवार (दि. १२) रोजी दुपारच्या सुमारास कंपनीतील पाच कामगार भाजले. ही घटना कशी घडली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. कंपनीतील स्टीम (वाफ) लिकीज झाल्याने हे कामगार भाजले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसात नोंद झाली नव्हती.सुरेंद्रकुमार सरोज (वय २०), फैयाज हमीद (वय २४), अभय राज (वय १९), सुधीर आवटी (वय ४०), मोहन सरोज (वय २५) (सर्व रा. कारगिल कॉलनी, कुरकुंभ, ता. दौंड) हे भाजले आहेत. त्यांच्यावर दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुपारी घटना घडल्यानंतर एकच धावपळ झाली. या वेळी सुधीर आवटी हे भाजलेच, परंतु पळत असताना ते पडले आणि त्यांचा हात फॅक्चर झाला. पाचही रुग्ण २० टक्के भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. समीर कुलकर्णी यांनी सांगितले.या घटनेची माहीती मिळताच दौंड पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर तसेच पोलीस जमादार पंडित मांजरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कुठल्याही स्वरुपाची जिवीतहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नसल्याचे उघड झाले. तरिही सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन संभाव्य उपाय योजना करण्याचे व पुढील काळात निर्माण होण-या अपघाताला टाळण्याबाबत उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(वार्ताहर)कारगील इंडिया ही कंपनी उच्च प्रतीच्या सुरक्षा सुविधा पुरवणारी ही कंपनी आहे. अचानक घडलेली ही घटना असुन रिफायनरी ४ मध्ये छोट्याशा आगीमुळे ही घटना घडली. यामध्ये किरकोळ जखमी वगळता कुठलीही मोठी हानी झाली नाही. नाही तरी पुढील तपास उच्च अधिकारी वर्गाकडुन करण्यात येत आहे . - संदीप मिसाळ, अधिकारी कारगिल इंडिया.