शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चासकमानमधून रब्बीचे पहिले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 01:36 IST

४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू; पिकांना होणार फायदा, टंचाई काही स्वरूपात संपणार

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन शुक्रवारी सकाळी १० वाजता आमदार सुरेश गोरे, उपअभियंता उत्तम राऊत यांच्या उपस्थितीत टेल टू हेड पद्धतीने सोडण्यात आले. सुमारे ४०० क्युसेक्स वेगाने हे पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.चासकमान धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणीनुसार पाणी सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरीप हंगामाच्या पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच १२ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात होते. परंतु खेड तालुक्यातील भीमा नदीतील पाणी कमी झाल्याने नदीअंतर्गत असलेल्या शेतकºयांची पिके धोक्यात आली होती. यामुळे काळूस संगमवाडी, शेलपिंपळगावसह पूर्व भागातील शेतकºयांनी २९ तारखेला भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊनही या निवेदनाची दखल न घेतल्याने काळूस व शेलपिंपळगाव येथील शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता. अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक कार्यालयाने या पत्राची दखल घेत येत्या चार ते पाच दिवसांत प्राधान्याने सर्व बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांनी आपल्या शेतात रब्बी हंगामातील घेण्यात आलेल्या कांदा, बटाटा, मका, गहू, आदीसह हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन हजारो हेक्टर पिकांना बहुतांश प्रमाणात फायदा होणार आहे. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने चासकमान धरणामधून शेतकºयांच्या मागणीनुसार खरीप हंगामाचे पहिले आवर्तन तब्बल ८९ दिवस सुरू ठेवल्याने ऐन आॅक्टोबरमध्ये १५ टक्के पाण्याची पातळी खालावली.मात्र सध्याच्या धरणातील पाण्याच्या परिस्थितीबरोबरच दुष्काळी परिस्थिती पाहता ऐन हिवाळ्यात चासकमानचे पाणी तापणार आहे.चासकमान धरणामधून पाणी सोडण्यात आल्याने धरणाअंतर्गत बँकअकाऊंटरवर असणाºया वाळद, आव्हाट, दरकवाडी, गुंडाळवाडी, वाडा, आदीसह विविध गावांतील पाणीपातळी खालावणार असल्याने गावातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतकºयांची पिके धोक्यात येणार असल्याने उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टेल टू हेड असा पाण्याचा वाद निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. कालव्याअंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमिनीमध्ये सतत पाणी साचून शेतजमिनीच्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणात नापिक झाल्या आहेत. दिवसेंदिवस पाण्याची नासाडी होत चालली आहे. मात्र पाण्याच्या होणाºया नासाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.कालव्याच्या अस्तरीकरणाची प्रतीक्षाचासकमान धरणाच्या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांना झाला आहे. कालव्याद्वारे पाणी सोडले जाते; परंतु पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे कालव्याचे अस्तरीकरणच झाले नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणी जर सोडले तरी कालवाफुटीची शक्यता जास्त असते. असे अनेक वेळा असे प्रकारही घडले आहेत. त्या मुळे कालव्यातुन जरी पाणी सोडले तरी ते शिरूरला कधी पोहोचेल, हे सांगता येत नाही.चासकमान धरणापासून ते कमान, चास, आखरवाडी, बहिरवाडी, भांबुरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान आदी भागात पाणीगळतीचे प्रमाण सर्वाधिक पाहावयास मिळत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊनसुद्धा ओढे-नाले शेतकºयांच्या शेतजमिनीमधून वाहताना दिसतात.कालव्याला असणाºया गळतीमुळे कालव्यातून ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जाते. त्यामुळे पाणी सोडले तर शेवटपर्यंत पाणी पोहोचतच नाही. यामुळे खेड तालुक्याच्या धरणक्षेत्रात असणाºया गावांना आणि शिरूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असणाºया नागरिकांना शेतीचे क्षेत्र वाचवण्यापासून वंचित राहावे लागते.मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांना ऐन दुष्काळात तेरावा महिना निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मागील दोन वर्षांपूर्वी कालव्याअंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे ‘धरण उराशी शेतकरी उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली होती. तशीच याही वर्षी परिस्थिती निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.चासकमान धरणामध्ये सध्या ८४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाणीपातळी ६४७.५८ मटीर आहे. धरणात एकूण साठा २०७.७३ दलघमी, उपयुक्त साठा १८०.५४ दलघमी इतका आहे. मागील वर्षी याच तारखेला १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणी पातळी ६३९.५३ मीटर, एकूण साठा २४१.६९ दलघमी, उपयुक्त साठा २१४.५० दलघमी होता. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी चासकमान धरणामध्ये १६ टक्के पाणीसाठा कमी आहे.शेतकरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ओरडून ओरडून दमला आहे, परंतु ना प्रशासन लक्ष देते ना राज्यकर्ते. प्रशासनाला गळती रोखण्यासंदर्भात विचारले असता प्रशासन राज्यकर्त्यांकडे बोट दाखवतआहे मात्र प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या वादात शेतकºयांच्या जमिनी मात्र वर्षानुवर्षे नापिक राहात आहेत. यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न संतप्त शेतकºयांना पडला आहे.