शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर कारखाना देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 15:09 IST

संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे.

ठळक मुद्देतांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार : सलग तिसऱ्यांदा मिळाला मान

नारायणगाव :  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या वतीने गाळप हंगाम २०१८-१९ साठी देण्यात येणाऱ्या तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सलग तिसऱ्यांदा देण्यात आला आहे.संपूर्ण देशातील भारतीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपॉल शर्मा यांच्या शुभहस्ते, तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्लीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष केतन पटेल, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे दि.२८ रोजी प्रदान करण्यात आला. विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप आणि संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी आणि कामगार युनियनचे पदाधिकारी यांनी तो स्वीकारला.

या पुरस्काराबद्दल बोलताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर म्हणाले की , श्री  विघ्नहर कारखान्याने गत हंगामात तांत्रिक कार्यक्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करत दैनंदिन ऊस गाळप क्षमता ५००० मे.टन असतानाही सुमारे ६००० मे.टन प्रतिदिनी गाळपाचा वेग ठेवून सरासरी ११२ टक्के क्षमतेचा वापर करत, संपूर्ण पुणे जिल्ह्यात उच्चांकी असे प्रथम क्रमांकाचे म्हणजेच १० लाख ७५ हजार ०७५ मे. टन इतक्या उसाचे गाळप केले असून, त्यापासून १२ लाख ५३ हजार ९२० क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. त्याचबरोबर ११.६५% साखर उतारा राखण्यात यश मिळविले. सहवीजनिर्मिती आणि डिस्टिलरी प्रकल्प पूर्णक्षमतेने चालवून सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ४ कोटी ५२ लाख ३३ हजार युनिट वीज निर्यात केली असून, डिस्टिलरीमधून ५४ लाख १४ हजार लिटर अल्कोहोल निर्मिती केलेली आहे.  कमीत कमी स्टॉपेजेस, वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण, स्टीमचा वापर,  विजेचा वापर, जास्तीत जास्त मिल एक्स्ट्रॅक्शन, बॉयलिंग हाऊस रिकव्हरी, बगॅस सेव्हिंग या सर्वबाबींचा विचार होऊन विघ्नहर कारखान्यास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .शेरकर पुढे म्हणाले की, संपूर्ण देशातील तांत्रिक कार्यक्षमतेचा सलग तिसऱ्यांदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे श्री विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानाची बाब असून, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी चेअरमन स्व.सोपानशेठ शेरकर यांच्या आदर्शाप्रमाणे विघ्नहर कारखान्याची यशोपताका अधिकाधिक उंचावली जात असून व्हाईस चेअरमन, सर्व संचालक यांच्या साथीने व सर्व सभासद बंधू-भगिनी, ज्येष्ठांचा आशीर्वाद, ऊसउत्पादक, अधिकारी व कर्मचारीवर्ग आणि तरुणवर्गाच्या सहकार्याने विघ्नहर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे सत्यशील शेरकर यांनी स्पष्ट केले. आगामी सन २०१९-२० गाळप हंगामात सुमारे ९ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने गाळप हंगामाची जोरदार तयारी सुरु असल्याचे शेरकर यांनी संगितले.

टॅग्स :Junnarजुन्नरSugar factoryसाखर कारखाने