शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वीच फटाक्यांचा धूर

By admin | Updated: October 10, 2014 06:22 IST

लक्ष वेधून घेण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्याची माळ किंवा आकाशातील आतषबाजी झाली

पिंपरी : लक्ष वेधून घेण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्याची माळ किंवा आकाशातील आतषबाजी झाली की, समजायचे उमेदवाराची प्रचार रॅली येत आहे. यासाठी बाजारपेठेत फटाक्यांना मागणी वाढली असून, दिवाळीपूर्वीच सर्वत्र फटाके फुटत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १२ आॅगस्टला लागू झाली. तेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. बैठका, मेळावा आणि रॅली काढत मतदारसंघात संपर्क वाढविण्यात आला. या प्रत्येक प्रसंगी फटाके फोडले गेले. प्रमुख पक्षांकडे उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यासाठी मोर्चेबांधणी करीत आपल्या पदरात तिकीट पडताच आनंदोत्सव साजरा केला गेला. या वेळेस मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आतषबाजी केली गेली. उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले गेले. लांबपर्यंतच्या रॅलीमध्ये ठिकठिकाणच्या चौकांत फटाके फोडले गेले. अपक्षांना मागणीप्रमाणे आवडीचे चिन्ह मिळाल्यानंतरही फटाक्याद्वारे आनंद साजरा केला गेला. प्रचाराचा नारळ फोडताना, संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. नेत्यांचे आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी, तसेच कोणी पाठिंबा दिल्यानंतर फटाक्याची लड पेटते. ज्येष्ठ आणि वजनदार नेते असतील तर, फटाक्याची संख्या अधिक असते. प्रचारास कमी अवधी शिल्लक असल्याने पदयात्रा आणि रॅली काढून मतदार संघ पिंजून काढला जात आहे. त्यामुळे फटाके आणि आतषबाजीची संख्या वाढतच आहे. कार्यकर्ते आणि समर्थक त्यात आघाडीवर आहेत. वस्ती, गर्दीचे ठिकाण, चौक आणि रस्त्यांवर ५ ते १० हजारांची माळ रचली जाते. उमेदवार किंवा नेते मंडळी जवळ येताच ती पेटवली जाते. ५ ते १० मिनिटे दणदणाट होतो. आवाज शांत होताच उमेदवारांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या जातात. उमेदवार हात जोडत अभिवादन करीत प्रकट होतो आणि पुढील कार्यक्रम सुरू होतो. आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रचारात रंगत आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून फटाक्यांची तडतड अधिकच वाढली. ती अद्याप कायम आहे. अर्ज भरण्यापासून सुरू झालेली ही दिवाळी येत्या सोमवारी (दि. १३) सायंकाळपर्यत कायम राहणार आहे. निवडणुकीमुळे फटाक्यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, रॅली, पदयात्रा आणि सभेच्या वेळी आवर्जून फटाके फोडले जातात. मोठ्या मोठ्या अनेक माळा असतात. त्यामुळे या ठिकाणी कागदाचा खच पडतो. रॅली आणि सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी हा कचरा तसाच पडून राहतो. महापालिकेच्या कर्मचारी हा कचरा साफ करतात. फटाक्यामुळे ध्वनी, वायुप्रदूषणासोबत कचराही वाढत आहे. (प्रतिनिधी)