शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

दिवाळीपूर्वीच फटाक्यांचा धूर

By admin | Updated: October 10, 2014 06:22 IST

लक्ष वेधून घेण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्याची माळ किंवा आकाशातील आतषबाजी झाली

पिंपरी : लक्ष वेधून घेण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्याची माळ किंवा आकाशातील आतषबाजी झाली की, समजायचे उमेदवाराची प्रचार रॅली येत आहे. यासाठी बाजारपेठेत फटाक्यांना मागणी वाढली असून, दिवाळीपूर्वीच सर्वत्र फटाके फुटत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १२ आॅगस्टला लागू झाली. तेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. बैठका, मेळावा आणि रॅली काढत मतदारसंघात संपर्क वाढविण्यात आला. या प्रत्येक प्रसंगी फटाके फोडले गेले. प्रमुख पक्षांकडे उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यासाठी मोर्चेबांधणी करीत आपल्या पदरात तिकीट पडताच आनंदोत्सव साजरा केला गेला. या वेळेस मोठ्या प्रमाणात फटाके फोडत आतषबाजी केली गेली. उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केले गेले. लांबपर्यंतच्या रॅलीमध्ये ठिकठिकाणच्या चौकांत फटाके फोडले गेले. अपक्षांना मागणीप्रमाणे आवडीचे चिन्ह मिळाल्यानंतरही फटाक्याद्वारे आनंद साजरा केला गेला. प्रचाराचा नारळ फोडताना, संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. नेत्यांचे आगमन झाले. सभा सुरू होण्यापूर्वी, तसेच कोणी पाठिंबा दिल्यानंतर फटाक्याची लड पेटते. ज्येष्ठ आणि वजनदार नेते असतील तर, फटाक्याची संख्या अधिक असते. प्रचारास कमी अवधी शिल्लक असल्याने पदयात्रा आणि रॅली काढून मतदार संघ पिंजून काढला जात आहे. त्यामुळे फटाके आणि आतषबाजीची संख्या वाढतच आहे. कार्यकर्ते आणि समर्थक त्यात आघाडीवर आहेत. वस्ती, गर्दीचे ठिकाण, चौक आणि रस्त्यांवर ५ ते १० हजारांची माळ रचली जाते. उमेदवार किंवा नेते मंडळी जवळ येताच ती पेटवली जाते. ५ ते १० मिनिटे दणदणाट होतो. आवाज शांत होताच उमेदवारांच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या जातात. उमेदवार हात जोडत अभिवादन करीत प्रकट होतो आणि पुढील कार्यक्रम सुरू होतो. आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रचारात रंगत आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून फटाक्यांची तडतड अधिकच वाढली. ती अद्याप कायम आहे. अर्ज भरण्यापासून सुरू झालेली ही दिवाळी येत्या सोमवारी (दि. १३) सायंकाळपर्यत कायम राहणार आहे. निवडणुकीमुळे फटाक्यांना मागणी वाढली आहे. दरम्यान, रॅली, पदयात्रा आणि सभेच्या वेळी आवर्जून फटाके फोडले जातात. मोठ्या मोठ्या अनेक माळा असतात. त्यामुळे या ठिकाणी कागदाचा खच पडतो. रॅली आणि सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी हा कचरा तसाच पडून राहतो. महापालिकेच्या कर्मचारी हा कचरा साफ करतात. फटाक्यामुळे ध्वनी, वायुप्रदूषणासोबत कचराही वाढत आहे. (प्रतिनिधी)