शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

आळंदी म्हातोबा येथील डोंगराला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST

आळंदी म्हातोबा गावाच्या बाजूने असणारे डोंगर पावसाळ्यात हिरवळीने नेहमीच नटलेले असतात. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत ...

आळंदी म्हातोबा गावाच्या बाजूने असणारे डोंगर पावसाळ्यात हिरवळीने नेहमीच नटलेले असतात. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत असते. परंतु काल दुपारी अचानक अज्ञात इसमाकडून या ठिकाणी आग लावण्यात आली आणि पाहता पाहता संपूर्ण डोंगरावर आगीचे लोळ पाहायला मिळाले. डोंगरावर चरायला गेलेली जनावरे गावाच्या दिशेने पळू लागली. गावच्या सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच श्रीहरी काळभोर व इतर सदस्यांनी तरुणांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु थोड्याच वेळात आगीने संपूर्ण डोंगर व्यापला होता. लोकवस्तीकडे सदरील आगीचा काही त्रास होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते तुषार जवळकर यांनी वनविभाग व अग्निशामक दलाला याबाबत कल्पना देताच अग्निशामक दलाच्या गाड्या डोंगराच्या पायथ्याशी हजर झाल्या होत्या. वनविभागाच्या १४ जणांच्या तुकडीने गावातील तरुणांच्या साहाय्याने २२ किलो वजनाचे ब्लोअर किट (हवेच्या दाबाचे मशिन) खांद्यावर नेऊन आगीवर नियंत्रण आणण्यात आणले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी गौरी तेलंग, गावकामगार तलाठी कणींचे व वनविभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

चौकट

आज दुपारनंतर हवा वाढल्याने पुन्हा एकदा आगीने रौद्र रूप धारण करताच वनविभागाची तुकडी आळंदी म्हातोबा येथे हजर झाली. कालच्या प्रमाणेच ब्लोअर किटच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु वनविभागाच्या अखत्यारीत असणारा मोठा परिसर व त्याच्या तुलनेत कमी प्रमाणात असणारे मनुष्यबळ यामुळे तातडीची सेवा मिळण्यास नेहमीच दिरंगाई होत असते. सध्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात शिकारी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी काडतुसे पेरत असल्याचे निदर्शनात आले होते. गावातील स्थानिक मेंढपाळ रेखा खताळ या प्रकारामुळे जखमी झाल्या होत्या. मल्हारगडामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे वनखात्याने अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी या ठिकाणी गस्त घालावी.

कोट

गणेश म्हस्के

वनपाल

रात्री आम्हाला आगीची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर दाखल झालो स्थानिक तरुणांच्या मदतीने व उपलब्ध साहित्याच्या आहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. आज दुपारीदेखील माझ्या टीमने उत्तम कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.