शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:01 IST

हमीभावात तफावत : शेतकऱ्यांना सोसावे लागतेय नुकसान, पूर्ण क्षमतेने खरेदीसाठी हवीत सक्षम केंद्रे

सासवड : येथील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडते असोसिएशनने हमीभावात असणाºया तफावतीच्या विरोधात खरेदी व्यवहार बंद ठेवल्याने लिलावच झाला नाही. केंद्र शासनाने १४ पिकांना उत्पादनखर्चाच्या दीड पट हमीभाव जाहीर केला. शेतकºयांकडून या निर्णयाचे स्वागतही झाले; पण केंद्राने जाहीर केलेला हमीभाव शेतकºयांना खात्रीने मिळेल, यासाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही. शिवाय, शासकीय धान्य खरेदी केंद्रे कधीही वेळेवर सुरू झाली नाहीत, त्यांच्या नियोजनात सुसूत्रता नाही. अशा स्थितीत जाहीर झालेला हमीभाव शेतकºयांना मिळणार कसा, हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

एकीकडे शासनाच्या हमीभावाच्या दरात माल खरेदी करायचा, तर दुसरीकडे कंपन्यांनी तोच माल हजार ते पंधराशे रुपयांच्या कमी भावात विकत घ्यायचा, या दुष्टचक्रात व्यापारी अडकले असून, त्यातून सोडवणूक करायची कशी, हा प्रश्न त्यांच्यासमोरदेखील निर्माण झालेला आहे. या दुष्टचक्रातून पयार्याने शेतकरी नाडला जात असून शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागलेले आहे. त्यामुळे यात शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हमीभावाची तफावत दूर करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी व सर्व स्तरांतून होत असल्याचे दिसून येते.पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतून लिलाव असल्याने अनेक शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी गहू, ज्वारी, मका तसेच सोयाबीन आणले असताना लिलाव न झाल्याने अनेक शेतकºयांना गाडीचे भाडे द्यावे लागले. त्यामुळे आर्थिक नुकसानदेखील सोसावे लागले.यामुळे शेतकºयांत प्रचंड नाराजी उमटली. या वेळी पुरंदर तालुका तसेच सासवड शहर अडते असोसिएशनच्या वतीने माल खरेदी न करण्याची आपली भूमिका ज्येष्ठ व्यापारी रूपचंद कांडगे यांनी स्पष्ट केली. या प्रसंगी संजय चव्हाण, नंदकुमार महाजन, विनीत जाळींद्रे, जितेंद्र महाजन, संतोष चिंचकर तसेच बिरदीचंद नवलखा हे उपस्थित होते.४शेतकºयांनी उत्पादित केलेला माल पूर्ण क्षमतेने शासनाची खरेदी केंद्रे खरेदी करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. व्यापाºयांना शासनाच्या हमीभावात माल खरेदी करणे परवडत नाही. पर्यायाने शेतकºयांनाच नुकसान सोसावे लागते. त्यामुळे शासनाने खासगी व्यापाºयांच्या खरेदीचा भाव व हमीभावातील फरकाची रक्कम शेतकºयांना अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी पुरंदर तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी