शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मार्केट यार्डातील चिखलामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:17 IST

गुलटेकडी मार्केट यार्डाच्या फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील काही गाळ्यासमोर पाणी, चिखल व राडारोडा साचत आहे. परिणामी काही भाज्यांना चिखल लागत असून शेतीमालाचा दर्जा खराब होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

पुणे - गुलटेकडी मार्केट यार्डाच्या फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील काही गाळ्यासमोर पाणी, चिखल व राडारोडा साचत आहे. परिणामी काही भाज्यांना चिखल लागत असून शेतीमालाचा दर्जा खराब होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, बाजार समितीने मार्केट यार्ड परिसरातील नालेसफाई केली असल्याचा दावा केला आहे. मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचे उघड झाले.मार्केट यार्डात गेल्या दोन वर्षांपासून नालेसफाईची कामे झाली नव्हती. यंदा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ही कामे हाती घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, पहिल्याच पावसात हा दावा फोल ठरला. शनिवारी झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात गाळ्यांसमोर पावसाचे पाणी साचले. रविवारी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने गाळ्यासमोरील चिखलात शेतमाल उतरावा लागला. त्यामुळे शेतमाल भिजून चिखलाने खराब झाला होता. परिणामी शेतमालाला कमी दर मिळाला.दरम्यान, गेल्या वर्षी बाजार समितीकडून काही ठराविक गाळ्यांसमोर बांधण्यात आलेले अनधिकृत कठडे पाडण्यात आले होते. मात्र, उर्वरित कठडे तसेच असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून चिखल होत आहे. त्यामुळे अडथळा ठरणारे कठडे बाजार समिती प्रशासनाकडून काढले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.बाजारातील काही रस्ते खराब झाले आहेत. कमी पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावर चिखल होतो. रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत पावसात या रस्त्यांवर काहीसा चिखल होईल. काही विभागातील डांबरीकरणाची कामे लवकरच केली जातील.- बी. जे. देशमुख,प्रशासक, बाजार समितीभेंडी, गवार, फ्लॉवरचे दर घसरलेपुणे : महिनाभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतमालाचे उत्पादन वाढू लागले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढत आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भेंडी, गवार, दोडका, फ्लॉवर, पावटा, मटार, आले, काकडीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. या भाज्या वगळता इतर सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.रविवारी मार्केट यार्डात सुमारे १७० ते १८० ट्रकइतकी शेतमालाची आवक झाली. त्यात परराज्यातून हिमाचल प्रदेशामधून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदोर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, बेंगलोर आले १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली.त्याचप्रमाणे स्थानिक भागातून सातारी आल्याची २ हजार २०० पोती, टॉमेटो ४ हजार ५०० ते ५ हजार क्रेट्स, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग २०० पोती, कांदा १०० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा ६० ट्रक इतकी आवक झाली, असे अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.दरम्यान, आवक वाढल्याने फळभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पावसाचा जोर अधिक वाढल्यास भाजीपाल्याच्या दरात आणखी घट होईल, अशी शक्यता व्यापाºयांकडून व्यक्त केली जात आहे.पालेभाज्या झाल्या स्वस्तपुणे : पावसामुळे पालेभाज्यांसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची दुप्पट आवक झाली. बाजारात कोथिंबिरीची २ लाख जुडी, तर मेथीची ५० हजार जुडी इतकी आवक झाली. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आदी पालेभाज्यांच्या दरात शेकडा जुडीमागे ५०० ते ८०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे सर्व पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. पालेभाज्यांचे शेकडा जुडीचे दर असे : कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ५००-८००, शेपू : ३००-६००, कांदापात : ७००-१०००, चाकवत : ४००-५००, करडई : ३००-४००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ४००-५००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ३००-४००, चुका : ७००-८००, चवळई : ४००-५००, पालक : ३००-४००.लिंबू, मोसंबी, संत्राचे दर घटलेपुणे : गुलटेकडी परिसरातील श्री छत्रपती मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सर्वच फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मोसंबी, संत्रा, लिंबू यांची आवक वाढल्याने दरात घट झाली. तसेच पपई आणि खरबुजाची आवक घट झाल्याने त्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डमधील फळबाजारात अननसाची २ ट्रक, मोसंबीची १० टन, संत्री ५०० किलो, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ७ ते ८ टेम्पोे, लिंबाची ४ ते ५ हजार गोणी, चिक्कू २०० बॉक्स, पेरु २०० क्रेटस्, कलिंगड ७ टेम्पो, खरबुज ३ ते ५ टेम्पो, सीताफळ २ टन, तर आंब्याची १ ते ३ टनइतकी आवक झाली, असे व्यापाºयांनी सांगितले. फळांचे दर असे : लिंबू (प्रतिगोणी) : ३०-५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १५०-३००, (४ डझन) : ६०-१३०, संत्रा : (३ डझन) २५०-४००, (४ डझन) : १५०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-३०, आरक्ता १०-४०, कलिंगड : ५-१०, खरबुज : २५-३०, पपई : १५-२०, चिक्कू : २००-५००, पेरु (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : २०-१५०, कर्नाटक आंबा : २०-३०, लालबाग : १०-१२, तोतापुरी : १२-१५, नीलम : १०-१२, बदाम : १०-१५, लंगडा ३००-५००, दशहरा (६ किलो) ३५०-५५०.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी