शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:35 IST

पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.

 उंडवडी कडेपठार : अखेर शिरसाई उपसा सिंचन योजनेतून ६ पंपाद्वारे मंगळवारी (दि. २५) आवर्तन सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुरवातीला उंडवडी कडेपठार ग्रामपंचायतीचे सरपंच भरत बनकर,उपसरपंच भुषण जराड यांनी आवर्तन सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सरपंच,उपसरपंच यांनी सांगितले.

शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आठ-दहा दिवस पाणी चालू असणार आहे.डाव्या कालव्याला ३ पंपांद्वारे व उजव्या कालव्याला ३ पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले.उजव्या कालव्यातून  सोनवडी,जळगाव,अंजनगाव,कारखेल तर डाव्या कालव्यातून उंडवडीकडेपठार,जराडवाडी,गोजुबावी,ब-हाणपुर,उंडवडी सुपे या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.जिरायती भागात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता.डिसेंबरनंतर रब्बी हंगामात बागायत क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली.त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.यामुळे सध्या पाण्याअभावी भूईमुग,मका,कडबा इतर पिके जळुन जाण्याच्या मार्गावर होती.त्याचबरोबर ग्रामस्थांनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शिरसाईचे आर्वतन सुरु झाल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभार्थी क्षेत्रातील बळीराजाला २२,५०० रुपये पर एम.सी.एफ.टी. दराने ५० टक्केहून अधिक प्रमाणात पाणी मिळणार आहे.मागील थकीत पाणीकराच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे.

तसेच चालू पाण्याची १०० टक्के रक्कम भरल्यावरच पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेला ७ नंबरचा फॉर्म भरुन पाण्याची मागणी करुन सहकार्य करावे,अशी विनंती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल शिंदे यांनी केली आहे.-----------------

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती