शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:35 IST

पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.

 उंडवडी कडेपठार : अखेर शिरसाई उपसा सिंचन योजनेतून ६ पंपाद्वारे मंगळवारी (दि. २५) आवर्तन सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुरवातीला उंडवडी कडेपठार ग्रामपंचायतीचे सरपंच भरत बनकर,उपसरपंच भुषण जराड यांनी आवर्तन सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सरपंच,उपसरपंच यांनी सांगितले.

शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आठ-दहा दिवस पाणी चालू असणार आहे.डाव्या कालव्याला ३ पंपांद्वारे व उजव्या कालव्याला ३ पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले.उजव्या कालव्यातून  सोनवडी,जळगाव,अंजनगाव,कारखेल तर डाव्या कालव्यातून उंडवडीकडेपठार,जराडवाडी,गोजुबावी,ब-हाणपुर,उंडवडी सुपे या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.जिरायती भागात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता.डिसेंबरनंतर रब्बी हंगामात बागायत क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली.त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.यामुळे सध्या पाण्याअभावी भूईमुग,मका,कडबा इतर पिके जळुन जाण्याच्या मार्गावर होती.त्याचबरोबर ग्रामस्थांनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शिरसाईचे आर्वतन सुरु झाल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभार्थी क्षेत्रातील बळीराजाला २२,५०० रुपये पर एम.सी.एफ.टी. दराने ५० टक्केहून अधिक प्रमाणात पाणी मिळणार आहे.मागील थकीत पाणीकराच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे.

तसेच चालू पाण्याची १०० टक्के रक्कम भरल्यावरच पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेला ७ नंबरचा फॉर्म भरुन पाण्याची मागणी करुन सहकार्य करावे,अशी विनंती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल शिंदे यांनी केली आहे.-----------------

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती