शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:35 IST

पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.

 उंडवडी कडेपठार : अखेर शिरसाई उपसा सिंचन योजनेतून ६ पंपाद्वारे मंगळवारी (दि. २५) आवर्तन सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुरवातीला उंडवडी कडेपठार ग्रामपंचायतीचे सरपंच भरत बनकर,उपसरपंच भुषण जराड यांनी आवर्तन सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सरपंच,उपसरपंच यांनी सांगितले.

शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आठ-दहा दिवस पाणी चालू असणार आहे.डाव्या कालव्याला ३ पंपांद्वारे व उजव्या कालव्याला ३ पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले.उजव्या कालव्यातून  सोनवडी,जळगाव,अंजनगाव,कारखेल तर डाव्या कालव्यातून उंडवडीकडेपठार,जराडवाडी,गोजुबावी,ब-हाणपुर,उंडवडी सुपे या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.जिरायती भागात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता.डिसेंबरनंतर रब्बी हंगामात बागायत क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली.त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.यामुळे सध्या पाण्याअभावी भूईमुग,मका,कडबा इतर पिके जळुन जाण्याच्या मार्गावर होती.त्याचबरोबर ग्रामस्थांनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शिरसाईचे आर्वतन सुरु झाल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभार्थी क्षेत्रातील बळीराजाला २२,५०० रुपये पर एम.सी.एफ.टी. दराने ५० टक्केहून अधिक प्रमाणात पाणी मिळणार आहे.मागील थकीत पाणीकराच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे.

तसेच चालू पाण्याची १०० टक्के रक्कम भरल्यावरच पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेला ७ नंबरचा फॉर्म भरुन पाण्याची मागणी करुन सहकार्य करावे,अशी विनंती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल शिंदे यांनी केली आहे.-----------------

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती