शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

अखेर ‘स्वाभिमानी’ सत्तेतून बाहेर, मुख्यमंत्र्यांना ४ सप्टेंबरला देणार लेखी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:49 IST

केंद्र व राज्यातील सत्तेमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : केंद्र व राज्यातील सत्तेमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांनी बुधवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी पुण्यात झाली. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्यास एकमताने मंजूरी दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह सत्तेतील पदांवर असणारे कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. देशातील व राज्यातील अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र, शेतकºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडत आहे. ४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे लेखी पत्र देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच सत्तेतून बाहेर पडल्याने बीजेपीला फरक पडणार नाही. मात्र, पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक आहे.- शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतकºयांची चळवळ उभी केली जात आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून या मोहिमेच्या दुसºया टप्प्यास सुरुवात केली जाईल. या अंतर्गत तेलंगणा, आंध्र प्रदेश,कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यातील शेतकºयांशी संपर्क साधला जाईल. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतर येथे देशभरातील १० लाख शेतकºयांचा मोर्चा काढला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.केंद्रेकरांची बदली का केली?राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्यास सुरूवात केली, त्यामुळेच त्यांची बदली झाली, याबाबतचे पुरावे असल्यामुळेच हा प्रश्न विचारणार असल्याचे शेट्टी म्हणाले.शरद पवारांनी उडविली खिल्लीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यावर ‘फक्त एकानेच पाठिंबा काढून घेतला का?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बारामतीमध्ये शेट्टी यांच्या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत मंत्रिपदाला चिकटून राहिले आहेत. तसेच पाठिंबा काढून घेतल्याचा काही परिणाम जाणवणार नाही, असेही पवार म्हणाले.जिल्हा परिषदेत भाजपाबरोबर सत्तेतचकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते भाजपाबरोबर कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ‘स्वाभिमानी’कडे महिला व बालकल्याण सभापतिपद असल्याने ते येथील सत्तेतून बाजूला होण्याची शक्यता कमी आहे.जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. त्यात ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य आहेत, त्यात एकाकडे सभापतिपदही आहे. पण राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेताना जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे. जिल्हा परिषदेशिवाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत संघटनेचा एक ‘स्वीकृत प्रतिनिधी’ आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातही संघटनेला संधी दिलेली आहे. या सर्वच ठिकाणी संघटना वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.सध्या राज्य पातळीवरील सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काय करायचा याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.- प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी