शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कामगारांच्या हितासाठी लढू - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 00:36 IST

जर देशाचे हित जोपासायचे असेल तर कष्टकरी कामगार वर्गाचे हित जपण्याची गरज आहे. या कामगारांच्या हितासाठी आपण कामगारांच्या पाठिशी राहु,’’ अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

कोरेगाव भीमा - ‘‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या कामगारांनी आपली प्राणाची आहुती दिली त्याच देशात कामगार व त्याच्या कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देशात ४ कोटी ५२ लाख तरुण बेकार आहेत अशा परिस्थितीत जर देशाचे हित जोपासायचे असेल तर कष्टकरी कामगार वर्गाचे हित जपण्याची गरज आहे. या कामगारांच्या हितासाठी आपण कामगारांच्या पाठिशी राहु,’’ अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, कामगार आयुक्त लाकसवार, कुसूम मांढरे, मोनिका हरगुडे तसेच महासंघांचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, दत्तात्रय येळवंडे, राजेंद्र दरेकर, रमेश सातपुते, सरचिटणीस अविनाश वाडेकर, गणेश जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवराय व कामगारांचे संघटन करणारे नारायणराव लोखंडे यांच्या प्रतिमापुजन करून शरद पवार यांना महात्मा फुलेंची पगडी घालून सन्मानित केले.पवार म्हणाले, महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत कामगारांचा मोठा वाटा असल्याने पूर्वी कष्टकरी कामगारांच्या सामुहिक शक्तीवर देशाची धोरणे ठरत होती. आता मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे कामगार संघटनांची ताकद पूर्वीसारखी राहिली नाही. त्यात कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल केल्याने देशात ४ कोटी ५२ लाख तरुण कामगार बेकार झाले आहेत. अशा परिस्थितीत कामगारांचा सन्मान व अधिकार जपण्यासाठी महासंघ करीत असलेले संघटन कार्य कौतुकास्पद आहे. किशोर ढोकले म्हणाले, देशात उद्योगपतींना केंद्रबिंदु मानुन धोरण आखली जात असल्याने कामगार व शेतक-यांवर मोठा अन्याय होत आहे. शेतक-यांप्रमाणेच कामगारही आर्थिक विवंचनेत आता आत्महत्या करु लागला आहे. जगात सर्वात जास्त तरुण बेकार अससणारा देश म्हणुन भारताची ओळख निर्माण झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे कामगार देशोधडीला लागला आहे.कार्याध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी कंत्राटीकरण, ग्रॅज्युईटी, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य, कामगारांचे हक्क यासह विविध प्रश्न मांडत सामान्यांची दु:खे जाणणारे व्यापक नेतृत्व असलेले शरद पवार यांनी कामगार हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार