शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कामगारांच्या हितासाठी लढू - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 00:36 IST

जर देशाचे हित जोपासायचे असेल तर कष्टकरी कामगार वर्गाचे हित जपण्याची गरज आहे. या कामगारांच्या हितासाठी आपण कामगारांच्या पाठिशी राहु,’’ अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.

कोरेगाव भीमा - ‘‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या कामगारांनी आपली प्राणाची आहुती दिली त्याच देशात कामगार व त्याच्या कुटुंबाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देशात ४ कोटी ५२ लाख तरुण बेकार आहेत अशा परिस्थितीत जर देशाचे हित जोपासायचे असेल तर कष्टकरी कामगार वर्गाचे हित जपण्याची गरज आहे. या कामगारांच्या हितासाठी आपण कामगारांच्या पाठिशी राहु,’’ अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली.कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघांच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, कामगार आयुक्त लाकसवार, कुसूम मांढरे, मोनिका हरगुडे तसेच महासंघांचे अध्यक्ष किशोर ढोकले, शिवाजीराव खटकाळे, दत्तात्रय येळवंडे, राजेंद्र दरेकर, रमेश सातपुते, सरचिटणीस अविनाश वाडेकर, गणेश जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवराय व कामगारांचे संघटन करणारे नारायणराव लोखंडे यांच्या प्रतिमापुजन करून शरद पवार यांना महात्मा फुलेंची पगडी घालून सन्मानित केले.पवार म्हणाले, महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीत कामगारांचा मोठा वाटा असल्याने पूर्वी कष्टकरी कामगारांच्या सामुहिक शक्तीवर देशाची धोरणे ठरत होती. आता मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे कामगार संघटनांची ताकद पूर्वीसारखी राहिली नाही. त्यात कामगार कायद्यांमध्ये मोठा बदल केल्याने देशात ४ कोटी ५२ लाख तरुण कामगार बेकार झाले आहेत. अशा परिस्थितीत कामगारांचा सन्मान व अधिकार जपण्यासाठी महासंघ करीत असलेले संघटन कार्य कौतुकास्पद आहे. किशोर ढोकले म्हणाले, देशात उद्योगपतींना केंद्रबिंदु मानुन धोरण आखली जात असल्याने कामगार व शेतक-यांवर मोठा अन्याय होत आहे. शेतक-यांप्रमाणेच कामगारही आर्थिक विवंचनेत आता आत्महत्या करु लागला आहे. जगात सर्वात जास्त तरुण बेकार अससणारा देश म्हणुन भारताची ओळख निर्माण झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे कामगार देशोधडीला लागला आहे.कार्याध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी कंत्राटीकरण, ग्रॅज्युईटी, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य, कामगारांचे हक्क यासह विविध प्रश्न मांडत सामान्यांची दु:खे जाणणारे व्यापक नेतृत्व असलेले शरद पवार यांनी कामगार हिताचे निर्णय व्हावेत, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार