शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रस्त्यावर उतरून नव्हे, तर चक्री उपोषणातून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:31 IST

मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आता रस्त्यावर उतरून नव्हे, तर येत्या २० आॅगस्टपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) बेमुदत चक्री उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाज यांचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.औरंगाबाद येथे समन्वयकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारी (दि. २०) दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चक्री उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या काळात आत्महत्या करणाºया आंदोलकांच्या कुटुंबीयांस नुकसानभरपाई मिळावी, शासकीय नोकरी द्यावी, आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यांसारख्या १५ मागण्यांकरिता बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाला गालबोट लागल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.याविषयी स्पष्टीकरण देताना पदाधिकाºयांनी आंदोलनात बाह्यशक्तींचा शिरकाव झाल्याने शांततेतील मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होत असून त्यामागील सूत्रधाराचा शोध घेतला जाईल.आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींची काळजी समाजबांधवांकडून घेतली जाणार आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत औरंगाबाद येथे पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल, असे याप्रसंगी सांगण्यात आले.गेल्या काही दिवसांत मुंबईसह औरंगाबाद, चाकण, कळंबोली, नवी मुंबई आदी परिसरात जाणीवपूर्वक दंगली घडविण्यात आल्या असून त्यात कोण सहभागी होते, याचा शोध घेण्याची गरज आहे. मात्र याविषयी शासनाची गुप्तचर यंत्रणेला अपयश आले आहे, अशी टीका समितीच्या वतीने करण्यात आली.या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, धनंजय जाधव, हनमंत मोटे, किशोर मोरे, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, सचिन आडेकर, युवराज दिसले, गणेश मापारी, मीना जाधव उपस्थित होते.आचारसंहितेचे फलक उभारणारआंदोलनात सहभागी होणाºयांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली असून, यात आंदोलनादरम्यान शांतता बाळगावी, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, आंदोलनाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल अशा प्रकारची कृती करू नये, कुठल्याही राजकीय पक्ष, संघटना यांचा सहभाग मोर्चात असणार नाही, याशिवाय मोर्चादरम्यान रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या यांची योग्य विल्हेवाट लावावी, आदी सूचनांचा समावेश असून, शहरभरात त्याचे मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा