शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या जमान्यात पुस्तकांचा लढा

By admin | Updated: January 19, 2016 01:33 IST

तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे

सुवर्णा नवले,  ज्ञानोबा तुकारामनगरी (पिंपरी)तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे आणि प्रभावहीन आहे, असा सूर ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?’ या तरुणाईवर आधारित मौलिक परिसंवादात पार पडला.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमंडपात हा परिसंवाद झाला. त्यात श्रीपाद अपराजित, राजन खान, कैलास इंगळे, दीपक पवार, जुई कुलकर्णी, राजेंद्र मुंडे सहभागी झाले होते. प्रतीक पुरी यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर परिसंवादात कार्यक्रमाचे अध्यक्ष अपराजित म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनात तरुणांची खाद्यान्नाची रांग दिसली. त्यावरून ती रांग साहित्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे, असे वाटते. नवीन पिढीत परिपक्वता आहे. मात्र, नव्या पिढीचे लेखन पुस्तकविक्रीच्या दृष्टिकोनातून होत आहे. त्यासाठी नव्या पिढीला व्यक्त होणे गरजेचे आहे.’’ राजन खान सडेतोड भाषेत तरुणाईवर बोलले. लेखक तरुण की वयस्कर, यावर त्या लेखकाचा नवोदितपणा अवलंबून नसतो. त्यामुळे लिखाण करणारा कोणीही असो, तो तरुण आणि नवोदितच असतो. आजच्या तरुणाचे लेखन भरीव नाही. सोशल मीडियावर लिखाण केले असता, कोणीही या शिंतोडे मारून जा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुस्तकांना स्वतंत्र ओळख आहे. तशी स्वतंत्र ओळख सोशल मीडियाच्या जमान्यात ब्लॉगलाही नाही. आजही लिखाण जाती-पातींत अडकून आहे. सध्या लिखाण आत्मकेंद्री झाले आहे. स्वत:चा प्रभाव पडेल, असा एकही लेखक समाजात नाही. सध्याच्या तरुणांच्या जाणिवा बधिर झाल्या आहेत. साहित्यात स्वत:च्या नावाची ओळख निर्माण करावी लागते. काहीही झाले तरीही वाचनसंस्कृती मरत नाही. नव्या पिढीला चांगल्या मूल्यांचे व नीतीचे स्वप्न पडण्याची गरज आहे.’’