शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:17 IST

हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा; पोलिसांनी मिळवून दिले ४ कोटी परत

- विवेक भुसे पुणे : बँकेतून बोलत असल्याचे सांगून तसेच तुम्हाला लॉटरी लागली आहे, विम्याचे पैसे मिळवून देतो, अशी असंख्य कारणे सांगून हॅकर्सनी वर्षभरात तब्बल साडेपाच हजार पुणेकरांच्या बँक खात्यातून कोट्यवधीची रक्कम लंपास केली आहे़ पुणे सायबर गुन्हे शाखेने वर्षभरा ४९ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.बँकेतून कोणीही फोन करुन तुमचा पासवर्ड मागत नाही़ कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका, असे बँका तसेच पोलिसांकडून जनजागृती केली जात असते़ तरीही सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़ भारतीय कंपन्यांशी संबंधित असलेले परदेशी व्यापारी कंपन्यांचे ई मेल हॅक करुन परस्पर दोन कंपन्यांमध्ये होत असलेले आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेऊन परदेशी व्यापारी कंपन्यांचे फेक ईमेल आयडी बनवून भारतीय कंपन्यांशी ई मेलद्वारे संपर्क साधून दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते़ नोकरीसाठी नामंवत कंपन्यांच्या साईटसारखी फेक साईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहे़ पुणे सायबर शाखेकडे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले होते़ त्यापैकी ४ हजार २२२ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६८० प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले़ तर ६०५ अर्ज दप्तरी दाखल केले गेले़ या प्रकरणात ४९ आरोपींना सायबर सेलने अटक केली़ या वर्षभरात सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता. प्रोक्सी सर्व्हर तयार करुन हकर्सनी एकाच वेळी २९ देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते़ याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी प्रत्यक्ष पैसे काढणाºया ११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये जप्त केले आहेत़३०० जणांना मिळाले ४ कोटी १२ लाख परतज्या आॅनलाईन तक्रारीत ओटीपी शेअर केला गेला असेल,तर त्या प्रकरणात बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रिफंड केली जात नाही़ अशा प्रकरणात पैसे विविध मर्चंट/ वॉलेटमध्ये पैसे गेले असतात़ सायबर सेलकडून संबंधितांना तातडीन मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून दिली जाते़ त्यात प्रामुख्याने नोकरीच्या बहाण्याने, क्रेडीट कार्ड असतानाही फसवणूक झाली़ तसेच कोणतीही बँकेची माहिती शेअर केली नसतानाही त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले, अशा सुमारे ३०० अर्जदारांबाबत सायबर सेलने संबंधित मर्चंट / वॉलेट यांच्याशी संपर्क साधून अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले़ २०१८ मध्ये सायबर सेलने अशा प्रकारे ४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५ रुपये रिफंड मिळवून दिला.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी