शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

मनात संवेदनांचा अंकुर रुजावा

By admin | Updated: May 22, 2016 00:59 IST

कमी काम करून जास्तीत जास्त श्रेय मिळविण्याची आजकालची मानसिकता आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्धीचा काकणभरही हव्यास न धरता केवळ मानवता हा धर्म मानून

पुणे : कमी काम करून जास्तीत जास्त श्रेय मिळविण्याची आजकालची मानसिकता आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्धीचा काकणभरही हव्यास न धरता केवळ मानवता हा धर्म मानून डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आपटे यांनी स्वत:ला कामात झोकून दिले आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित भूमिका करण्याची संधी मिळाल्याने माझे आयुष्यच बदलले. हा मानवतेचा धर्म सर्वांनी पाळायला हवा. स्वत:च्या क्षमतेप्रमाणे इतरांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी ठेवायला हवी. प्रत्येकाने सजग नागरिक, माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. त्यासाठी मनात संवेदनांचा अंकुर सतत रुजवायला हवा, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी प्रियाकांजी महिला उद्योग संस्थेतर्फे आयोजित राजीव गांधी कला गौरव पुरस्काराने सोनाली कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी मंत्री पतंगराव कदम, माजी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील, सतीश देसाई, अनंत पाटील, रमेश बागवे, अभय छाजेड, संजीवनी बालगुडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दिमाखदार नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करताना कुलकर्णी म्हणाल्या, ‘सध्याचा काळ तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे उदयोन्मुख कलावंतांनी आणि त्यांच्या पालकांनी अद्ययावत ज्ञान मिळवायला हवे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने प्रोत्साहन मिळते तसेच आत्मविश्वास वाढतो. चांगले कलागुण निश्चितच हेरले जातात. मात्र, त्यासाठी थोडा संयम बाळगायला हवा.’पतंगराव कदम म्हणाले, ‘राजीव गांधी यांचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. नव्या योजना, दूरदृष्टी, चांगले निर्णयही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. अशा महान नेत्यांचा इतिहास, भूगोल पुसून टाकण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. मात्र, नव्या पिढीला हा इतिहास समजून सांगण्याची नितांत गरज आहे.’ सोनाली कुलकर्णीच्या एकाहून एक सरस भूमिकांचे कौतुक करत यापुढेही अधिकाधिक चांगल्या भूमिका वाट्याला याव्यात, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.’हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला, हे अत्यंत महत्त्वाचे असते. कार्यातूनच त्याच्या व्यक्तित्वाची समाजाला ओळख होते. पुणे ही कलाकारांची भूमी आहे. याच मातीतून सोनालीने कलाक्षेत्रात पदार्पण केले. लवकरच तिच्या भूमिकांचा सुवर्ण महोत्सव साजरा व्हावा, अशी सर्व रसिकांची इच्छा आहे.’संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक संजय बालगुडे यांनी प्रास्ताविक केले.