शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही..! उजनी धरण क्षेत्रात मगरीचे पुन्हा वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 18:34 IST

उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा दोन तीन वर्षापासून होत आहेत..

ठळक मुद्देमासेमार ,शेतकरी आणि पर्यटक यांच्यात भीती

इंदापूर : उजनी धरणात मगर आहे अशा चर्चा मागील दोन वर्षापासून होत होत्या. आणि अशातच चार दिवसापूर्वी  भीमा नगर परिसरात महाकाय मगर सापडली आणि मच्छिमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मात्र ती महाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनीकिनारी असणाऱ्या वनविभागाच्या अधिवासात सोडल्याच्या चर्चेमुळे मासेमार ,शेतकरी आणि पर्यटक यांच्यात भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे.उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा गेल्या दोन तीन वर्षापासून होत आहेत.करमाळा तालुक्यातील कंधर येथे मासेमाराच्या जाळीत मगर अडकली होती.तर उजनी येथील भीमानगर येथील मत्स्य केंद्राच्या तळ्यामध्ये मगरी असल्याच्या माहिती मिळत होती.तर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव ,तक्रारवाडी आणि डिकसळ परिसरातही मासेमाराना मगरीने दर्शन दिलेले असल्याची माहिती मिळत आहे.असे असताना दोन दिवसापूर्वी १२ फुट लांब आणि जवळपास १५० ते २०० किलो वजनाच्या महाकाय मगरीला भोई समाजातील महादेव नगरे ,मामू भोई ,नितीन सल्ले ,अशोक पतुले ,रवींद्र नगरे या मासेमार तरुणांनी जीवाची बाजी लावून पकडण्यात यश मिळविले होते.तसेच या महाकाय मगरीला पकडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले होते.मात्र वनविभागाने हि मगर धुमाळवाडी येथील उजनी शेजारील वनक्षेत्रात सोडल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी तसेच मासेमार धास्तावून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.तर या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक परदेशी पक्षांना पाहण्यासाठी येत असतात त्यांच्या जीवितालाही धोका असल्याचे बोलले जात आहे.मगर या भागात सोडल्याच्या माहितीमुळे शेतकरी शेताला पाणी देण्यास जाण्यासाठी घाबरू लागल्याचे सांगितले जात आहे.उजनी धरणाच्या किनारी असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्रालगत अनेकांची बागायत शेती असून जर वनविभागाने या ठिकाणी मगर सोडली असेल तर ते अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले.तर वन्यजीव महत्वाचे असले तरी त्याचा मानवी जीवनावर धोका असेल तर याचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.वनविभागाने उजनी किनारी असणाऱ्या वन क्षेत्रात मगर सोडली असल्याची माहिती काही मच्छीमार बांधवांनी दिली आहे. मात्र यातून मासेमारांच्या जीविताला धोका पोहचू शकतो आणि याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का असा सवाल महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समितीचे नंदकुमार नगरे यांनी केला.तसेच जर अशाप्रकारे मगर सोडल्याचे निष्पण झाल्यास मच्छीमार आंदोलन करणार असल्याचे सांगितले.याबाबत इंदापूर वनक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना माहिती विचारली असता त्यांनी ही मगर इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मुक्त केली असल्याचे सांगितले.मात्र, ती मगर नक्की कोणत्या ठिकाणी सोडली याबाबत माहिती देण्याचे टाळले. तसेच सापडलेल्या मगरीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधी अनाथालयातील पथक आले असल्याचे सांगितले.मात्र, कात्रजला ठेवण्यासाठी उपाय योजना नसल्यामुळे तसेच वन्यजीव कायदा नुसार मगर वनविभागाच्या अधिवासात सोडली असल्याचे सांगितले.

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरण