शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

भय इथले संपत नाही..! उजनी धरण क्षेत्रात मगरीचे पुन्हा वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 18:34 IST

उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा दोन तीन वर्षापासून होत आहेत..

ठळक मुद्देमासेमार ,शेतकरी आणि पर्यटक यांच्यात भीती

इंदापूर : उजनी धरणात मगर आहे अशा चर्चा मागील दोन वर्षापासून होत होत्या. आणि अशातच चार दिवसापूर्वी  भीमा नगर परिसरात महाकाय मगर सापडली आणि मच्छिमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मात्र ती महाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनीकिनारी असणाऱ्या वनविभागाच्या अधिवासात सोडल्याच्या चर्चेमुळे मासेमार ,शेतकरी आणि पर्यटक यांच्यात भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे.उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा गेल्या दोन तीन वर्षापासून होत आहेत.करमाळा तालुक्यातील कंधर येथे मासेमाराच्या जाळीत मगर अडकली होती.तर उजनी येथील भीमानगर येथील मत्स्य केंद्राच्या तळ्यामध्ये मगरी असल्याच्या माहिती मिळत होती.तर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव ,तक्रारवाडी आणि डिकसळ परिसरातही मासेमाराना मगरीने दर्शन दिलेले असल्याची माहिती मिळत आहे.असे असताना दोन दिवसापूर्वी १२ फुट लांब आणि जवळपास १५० ते २०० किलो वजनाच्या महाकाय मगरीला भोई समाजातील महादेव नगरे ,मामू भोई ,नितीन सल्ले ,अशोक पतुले ,रवींद्र नगरे या मासेमार तरुणांनी जीवाची बाजी लावून पकडण्यात यश मिळविले होते.तसेच या महाकाय मगरीला पकडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले होते.मात्र वनविभागाने हि मगर धुमाळवाडी येथील उजनी शेजारील वनक्षेत्रात सोडल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी तसेच मासेमार धास्तावून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.तर या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक परदेशी पक्षांना पाहण्यासाठी येत असतात त्यांच्या जीवितालाही धोका असल्याचे बोलले जात आहे.मगर या भागात सोडल्याच्या माहितीमुळे शेतकरी शेताला पाणी देण्यास जाण्यासाठी घाबरू लागल्याचे सांगितले जात आहे.उजनी धरणाच्या किनारी असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्रालगत अनेकांची बागायत शेती असून जर वनविभागाने या ठिकाणी मगर सोडली असेल तर ते अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले.तर वन्यजीव महत्वाचे असले तरी त्याचा मानवी जीवनावर धोका असेल तर याचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.वनविभागाने उजनी किनारी असणाऱ्या वन क्षेत्रात मगर सोडली असल्याची माहिती काही मच्छीमार बांधवांनी दिली आहे. मात्र यातून मासेमारांच्या जीविताला धोका पोहचू शकतो आणि याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का असा सवाल महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समितीचे नंदकुमार नगरे यांनी केला.तसेच जर अशाप्रकारे मगर सोडल्याचे निष्पण झाल्यास मच्छीमार आंदोलन करणार असल्याचे सांगितले.याबाबत इंदापूर वनक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना माहिती विचारली असता त्यांनी ही मगर इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मुक्त केली असल्याचे सांगितले.मात्र, ती मगर नक्की कोणत्या ठिकाणी सोडली याबाबत माहिती देण्याचे टाळले. तसेच सापडलेल्या मगरीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधी अनाथालयातील पथक आले असल्याचे सांगितले.मात्र, कात्रजला ठेवण्यासाठी उपाय योजना नसल्यामुळे तसेच वन्यजीव कायदा नुसार मगर वनविभागाच्या अधिवासात सोडली असल्याचे सांगितले.

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरण