शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 09:55 IST

भोर तालुक्यात शेतकऱ्याचे  मुख्य पीक भात हे आहे. याचे लागवडीचे क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर तर भुईमुग ४ हजार १०० हेक्‍टर व सोयाबीन ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे

महूडे (पुणे): गेले काही दिवसांपासून पाऊसाने ओड दिली होती. परंतु गुलाब या वादळामुळे भोर तालुक्यात ढगाळ वातावरण आहे तसेच पाऊसाच्या तुरळक सरी पडल्याने बळीराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. या पावसामुळे सोयाबीन व भुईमूग या पिकाचे काय होणार? यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

भोर तालुक्यात शेतकऱ्याचे  मुख्य पीक भात हे आहे. याचे लागवडीचे क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर तर भुईमुग ४ हजार १०० हेक्‍टर व सोयाबीन ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पडणारा पाऊस हा भात पिकास पोषक असला तरी काढणीस आलेल्या भुईमूग व सोयाबीन पिकास घातक आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भुईमूग व सोयाबीन ही पिके काढणीस आली आहेत. त्यामुळे ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे. परंतु मंगळवार (दि.२८) रोजी दुपारी पाऊस झाल्याने भुईमुग, सोयाबीनची काढणी बंद करावी लागली.

बालशौर्य: तेरा वर्षांच्या आयुषने दिले दोघांना ‘आयुष्य’

सध्या शेतीच्या कामासाठी मजुरास २०० रुपये रोज दिला जात आहे. तर अनेक शेतकरी ( वारंगुळा ) एकत्र पद्धतीने पिकांची काढणी करत आहेत. सोयाबीन काढल्यानंतर पावसाच्या भीतीमुळे शेतातच मशीन (यांत्रिक ) भरडले जात आहे. त्यासाठी एका भरलेल्या सोयाबीन पोत्याचे ४०० रुपये घेतले जात आहे. सोयाबीड काढणीनंतर भरडण्यासाठी मशीन वेळेत मिळत नाही त्यामुळे काहींनी शेतातच काढलेले सोयाबीन व्यवस्थित रचून ठेवले आहे. पावसात भिजू नये म्हणून त्यावर प्लास्टिक कागद ठेवला आहे.शेतातून काढून आणलेल्या भुईमूग शेंगा पावसात वाळवायच्या कशा? हाही प्रश्न बळीराजा समोर उभा आहे. 

सोयाबीन यांत्रिक पद्धतीने भरडण्यास एका पोत्यात चारशे रुपये दिले जातात. कारण डिझेल किंमतीत वाढ झाल्यामुळे सोयाबीन मशीनद्वारे भरडण्यासाठी किंमतीत वाढ नाईलाजास्तव करावी लागत असल्याचे सोयाबीन मशीनद्वारे भरडणारे विजय बांदल, रुपेश बांदल, सर्जेराव बांदल ( ब्राम्हणघार ) हरिदास खाटपे,  ( शिंद )यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड