शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतकरी चालविणार स्वत:च्या मालकीची ‘कंपनी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 19:53 IST

कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे.

ठळक मुद्देआदिवासी शेतकरी, आदिवासी विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प

खेड (डेहणे) : खेडच्या पश्चिम भागातील अदिवासी भात उत्पादक शेतकरी आता स्वत:ची ‘धान्य प्रक्रिया’ करणारी कंपनी स्थापन करणार आहेत. या कंपनीची स्थापना व त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दरकवाडी (ता. खेड) येथे आदिवासी शेतकºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही नावीन्यपूर्ण संकल्पना सहायक जिल्हा अधिकारी व आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांची असून त्यांनी या बैठकीत आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आदिवासी शेतकरी, आदिवासी विभाग, घोडेगाव, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कंपनीत जुन्या भात वाणाचे संवर्धन, सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादन, हाताळणी, प्रतवारी व कंपनीच्या ब्रँडवर विक्री होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. आयुष प्रसाद यांनी अदिवासी शेतकरी गट स्थापन करून, संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कंपनीत दलालांना जागा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. सेंद्रीय पद्धतीने जुन्या व पारंपारिक भात वाणाच्या उत्पादनासाठी व येणाऱ्यां अडचणींवर मात करण्यासाठी खेड कृषी विभाग तांत्रिक मदत करेल, अशी ग्वाही तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. यावेळी सह्याद्री स्कूलच्या दीपा मोरे यांनी मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी आर. बी. बारवे, कृषी पर्यवेक्षक आर. ए. जाधव, कृषी सहायक एस. पी. इंदोरे, एस. बी. रोडे, पी. एन. पवार, डी. जी. डोलारे, एस. के. सुपे, नाईकरे, आदिवासी शेतकरी तुकाराम भोकटे, हरिभाऊ तळपे, मंदा काठे, सुभाष डोळस, किरण वाळुंज, रामदास लांडगे व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :KhedखेडFarmerशेतकरीagricultureशेतीbusinessव्यवसाय