शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:09 IST

विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे

पुणे, दि. 27 : विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अखिल भारतीय द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, राज्य संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर आणि कैलास भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, रेल्वेस्थानके व विमानतळावर फळविक्री सुरू करण्याबाबत अपेडाने तत्वत: मान्यता दिली आहे. निर्यातक्षम माल ठेवल्यास या ठिकाणी फळांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. राज्य सरकारनेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.राज्यात फळबागांची स्थिती चांगली असली तरी आता पुढील काळात नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीवर होणारा खर्च कमी करणे आणि उत्पादनाचा दर्जा वाढविणे, हे सुत्र अवलंबण्याची गरज आहे. आता केवळ ज्वारी, गहू, तांदुळ पिकवून शेतकºयांचे भवितव्य बदलणार नाही. त्यासाठी शेतीला पुरक व्यवसायांचा विचार करण्याची गरज आहे. शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील, असा विश्वास आहे. वाहतुक खर्च कमी करण्यासाठी देशातील १२ मोठ्या आणि २०० छोट्या बंदरांवरून अधिकाधिक कृषीमाल वाहतुक व निर्यातीसाठी प्रयत्न केले जात आहेत. द्राक्षाची मोठी बाजारपेठ असून बेदाणे निर्यातीसाठीही सांगली येथे जागेचा प्रस्ताव आहे, असेही गडकरी यांनी नमुद केले.पवार म्हणाले, सर्व पिकांमध्ये पारंपरिक पिके यावीत. हायब्रीडला काही अर्थ नाही, असे चमत्कारिक मत दिल्लीतील काही जण मांडतात. पण असे करून चालणार नाही. जगातून ज्याला मागणी आहे, पैसे जिथून मिळतात, त्या पिकांवर लक्ष देण्याची गरज आहे. नवीन वाणांना प्रोत्साहित करण्याची शासनाची भुमिका असावी. आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबर स्थानिक बाजारात शेतमालाचे मार्केटिंगसाठी चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल.द्राक्षाच्या नवीन जाती आणण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही आर्थिक मदत करेल, असे फुंडकर यांनी सांगितले. कांचन यांनी महाराष्ट्रात बेदाणे पार्क उभारण्याची मागणी केली.----------------------... तर गुंतवणुक वाढवावी लागेलपुढील पाच वर्षात शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची पंतप्रधानांची कल्पना आहे. त्यासाठी या क्षेत्रातील गुंतवणुक व शेतीची उत्पादकता वाढवावी लागणार आहे. शेतीमध्ये परवडणारे यांत्रिकीकरण आणणे गरजेचे आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAirportविमानतळFarmerशेतकरी