शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:09 IST

विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे

पुणे, दि. 27 : विमानतळांवर सर्व विदेशी कंपन्यांच्या विविध बॅ्रंडची दालने असतात. तिथे देशातील उत्पादनांनाही स्थान मिळायला हवे. त्यादृष्टीने देशातील विमानतळांसह रेल्वे स्थानकांवरही विविध फळविक्रीची स्वतंत्र दालने सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे दिली.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अखिल भारतीय द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, राज्य संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, खजिनदार महेंद्र शाहीर आणि कैलास भोसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, रेल्वेस्थानके व विमानतळावर फळविक्री सुरू करण्याबाबत अपेडाने तत्वत: मान्यता दिली आहे. निर्यातक्षम माल ठेवल्यास या ठिकाणी फळांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. राज्य सरकारनेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.राज्यात फळबागांची स्थिती चांगली असली तरी आता पुढील काळात नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीवर होणारा खर्च कमी करणे आणि उत्पादनाचा दर्जा वाढविणे, हे सुत्र अवलंबण्याची गरज आहे. आता केवळ ज्वारी, गहू, तांदुळ पिकवून शेतकºयांचे भवितव्य बदलणार नाही. त्यासाठी शेतीला पुरक व्यवसायांचा विचार करण्याची गरज आहे. शेतकरीच पेट्रोल, डिझेलला पर्याय तयार करतील, असा विश्वास आहे. वाहतुक खर्च कमी करण्यासाठी देशातील १२ मोठ्या आणि २०० छोट्या बंदरांवरून अधिकाधिक कृषीमाल वाहतुक व निर्यातीसाठी प्रयत्न केले जात आहेत. द्राक्षाची मोठी बाजारपेठ असून बेदाणे निर्यातीसाठीही सांगली येथे जागेचा प्रस्ताव आहे, असेही गडकरी यांनी नमुद केले.पवार म्हणाले, सर्व पिकांमध्ये पारंपरिक पिके यावीत. हायब्रीडला काही अर्थ नाही, असे चमत्कारिक मत दिल्लीतील काही जण मांडतात. पण असे करून चालणार नाही. जगातून ज्याला मागणी आहे, पैसे जिथून मिळतात, त्या पिकांवर लक्ष देण्याची गरज आहे. नवीन वाणांना प्रोत्साहित करण्याची शासनाची भुमिका असावी. आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबर स्थानिक बाजारात शेतमालाचे मार्केटिंगसाठी चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल.द्राक्षाच्या नवीन जाती आणण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारही आर्थिक मदत करेल, असे फुंडकर यांनी सांगितले. कांचन यांनी महाराष्ट्रात बेदाणे पार्क उभारण्याची मागणी केली.----------------------... तर गुंतवणुक वाढवावी लागेलपुढील पाच वर्षात शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची पंतप्रधानांची कल्पना आहे. त्यासाठी या क्षेत्रातील गुंतवणुक व शेतीची उत्पादकता वाढवावी लागणार आहे. शेतीमध्ये परवडणारे यांत्रिकीकरण आणणे गरजेचे आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAirportविमानतळFarmerशेतकरी