शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ; राज्यात खरेदी केवळ १० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 08:11 IST

नोंदणीसाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला; पण खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन खुल्या बाजारातच विकले. परिणामी राज्यात १० डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. तब्बल १४ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवताना शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती; मात्र खरेदी केवळ १० टक्क्यांपर्यंतच पोहोचल्याने नोंदणीसाठी आता ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.

राज्य सरकारने ४,८९२ रुपये प्रतिक्विंटलने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना दिले होते. नाफेडने १ ऑक्टोबरला शेतकऱ्यांना नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली. ही मुदत रविवार, १५ डिसेंबरला संपत आहे.

राज्यात यासाठी ५८१ केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील ५५१ केंद्रे सुरू असल्याची माहिती सहकार व पणन विभागाने दिली. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी ३ लाख ६५ हजार ४४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील २ लाख १ हजार ७२७ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीचे नियोजन करण्यात आले; मात्र आतापर्यंत केवळ १ लाख ३१ हजार ८७५ टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. नाफेडने १ लाख १ हजार ९३७, तर एनसीसीएफने २९ हजार ३९३ टनांची खरेदी केली आहे. ही खरेदी ६७,७५३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

खुल्या बाजाराला दिली पसंती

सोयाबीन खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. त्यातच ऐन काढणी वेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पर्यायाने सोयाबीन काढताना त्यातील आर्द्रतेचे प्रमाण खरेदीतील निकषांपेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांनी हे सोयाबीन खुल्या बाजारात विकणे पसंत केले. तसेच याच काळात दिवाळीही असल्याने शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे पाठ फिरवली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार