शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

शेतकऱ्यांनी संघटित होऊन राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 21:05 IST

मंचर ( पुणे ) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना ...

मंचर (पुणे) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

पिंपळगाव खडकी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. धोरणे दिल्लीमध्ये ठरतात. त्यांचे दुष्परिणाम गाव-खेड्यांतील शेतकऱ्यांना भोगावे लागतात. कांद्यावर निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. पामतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडण्याचे पापदेखील केले आहे. दुधाला बाजारभाव नाही. दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान देण्याचे गाजर दाखवून अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकरी व जनावरांचा जीव गेला आहे. या भागातील शेतकऱ्यांनादेखील खूप काही भोगावे लागत आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे.

प्रभाकर बांगर यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सर्वांनी जीव लावला पाहिजे. या भागालादेखील चळवळीतील काम करणारा एक सक्षम नेतृत्व मिळाले पाहिजे. आज आपण चारचाकी गाडी वर्गणी काढून त्यांना भेट दिली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, माजी सरपंच संतोष गावडे, हभप बाजीराव महाराज बांगर, सरपंच दीपक पोखरकर, सचिन बांगर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना यावेळी लोकवर्गणीतून चारचाकी वाहन भेट देण्यात आले. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रभाकर बांगर यांना अगदी शंभर रुपयांपासून २५ हजारांपर्यंत मदत केली व चारचाकी गाडी लोकवर्गणीतून घेऊन दिली आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे