शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

शेतकऱ्यांनी संघटित होऊन राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 21:05 IST

मंचर ( पुणे ) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना ...

मंचर (पुणे) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

पिंपळगाव खडकी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. धोरणे दिल्लीमध्ये ठरतात. त्यांचे दुष्परिणाम गाव-खेड्यांतील शेतकऱ्यांना भोगावे लागतात. कांद्यावर निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. पामतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडण्याचे पापदेखील केले आहे. दुधाला बाजारभाव नाही. दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान देण्याचे गाजर दाखवून अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकरी व जनावरांचा जीव गेला आहे. या भागातील शेतकऱ्यांनादेखील खूप काही भोगावे लागत आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे.

प्रभाकर बांगर यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सर्वांनी जीव लावला पाहिजे. या भागालादेखील चळवळीतील काम करणारा एक सक्षम नेतृत्व मिळाले पाहिजे. आज आपण चारचाकी गाडी वर्गणी काढून त्यांना भेट दिली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, माजी सरपंच संतोष गावडे, हभप बाजीराव महाराज बांगर, सरपंच दीपक पोखरकर, सचिन बांगर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना यावेळी लोकवर्गणीतून चारचाकी वाहन भेट देण्यात आले. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रभाकर बांगर यांना अगदी शंभर रुपयांपासून २५ हजारांपर्यंत मदत केली व चारचाकी गाडी लोकवर्गणीतून घेऊन दिली आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे