शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

शेतकऱ्यांनी संघटित होऊन राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 21:05 IST

मंचर ( पुणे ) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना ...

मंचर (पुणे) : शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

पिंपळगाव खडकी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. धोरणे दिल्लीमध्ये ठरतात. त्यांचे दुष्परिणाम गाव-खेड्यांतील शेतकऱ्यांना भोगावे लागतात. कांद्यावर निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. पामतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडण्याचे पापदेखील केले आहे. दुधाला बाजारभाव नाही. दुधाला पाच रुपये लिटरला अनुदान देण्याचे गाजर दाखवून अटी व शर्ती घालून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक शेतकरी व जनावरांचा जीव गेला आहे. या भागातील शेतकऱ्यांनादेखील खूप काही भोगावे लागत आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन भविष्यकाळामध्ये या प्रश्नावर आवाज उठवून राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे.

प्रभाकर बांगर यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही सर्वांनी जीव लावला पाहिजे. या भागालादेखील चळवळीतील काम करणारा एक सक्षम नेतृत्व मिळाले पाहिजे. आज आपण चारचाकी गाडी वर्गणी काढून त्यांना भेट दिली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, माजी सरपंच संतोष गावडे, हभप बाजीराव महाराज बांगर, सरपंच दीपक पोखरकर, सचिन बांगर यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन संदीप वाबळे यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांना यावेळी लोकवर्गणीतून चारचाकी वाहन भेट देण्यात आले. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी प्रभाकर बांगर यांना अगदी शंभर रुपयांपासून २५ हजारांपर्यंत मदत केली व चारचाकी गाडी लोकवर्गणीतून घेऊन दिली आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणे