शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वाढीव दराच्या फायद्याचा वाटा शेतकऱ्यांनाही हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखरेच्या निर्यातीची वाढ व उपपदार्थ विक्रीतून मिळणारा फायदा यातील वाटा कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखरेच्या निर्यातीची वाढ व उपपदार्थ विक्रीतून मिळणारा फायदा यातील वाटा कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

रंगराजन समितीचीच तशी शिफारस असल्याने या मागणीत काहीही गैर नाही, ती न्याय मागणी आहे व आम्ही संघटनेच्या स्तरावर त्याचा पाठपुरावा करू, असे शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील व थायलंड हे सर्वात मोठे साखर पुरवठादार आहेत. दुष्काळामुळे त्यांचे ऊस उत्पादन कमी झाले, उतारा कमी मिळाला, त्यामुळे या वर्षी त्यांची साखर बाजारात फार कमी प्रमाणात आली. त्याचा फायदा भारताला मिळाला. खुल्या बाजारात भारतातील साखरेला चांगला दर मिळाला व ती वाढीव रक्कम थेट कारखान्यांना मिळाली. त्याशिवाय भारतातही सणासुदीमुळे साखरेच्या मागणीत एकदम वाढ झाली. साखरेच्या उपपदार्थांचे दरही वाढले. कारखान्यांच्या आर्थिक फायद्यात वाढ झाली.

तोटा झाला की त्याचा बोजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर टाकणाऱ्या कारखानदारांनी आता फायद्याचा वाटा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी संघटना करत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. साखरेचा वाढीव दर तसेच उपपदार्थ विक्रीतून मिळालेले पैसे कारखान्याच्या हिशेबात स्वतंत्र जमेस धरले जातात. दर नियंत्रण समिती याचा अभ्यास करत असते. त्यांच्याकडे ही जमा दाखवावी लागते. त्याचा जो काही फायदा असेल तो शेतकऱ्यांना ७५ व कारखान्यांना २५ टक्के दराने द्यावा, असे रंगराजन समिती सांगते. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) द्यावी व ही जास्तीच्या फायद्याची रक्कम स्वतंत्रपणे द्यावी, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.