शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सलोखा योजनेतून शेतकऱ्यांचे वाचले ३ कोटींची शुल्क, ३३४ दस्तांची नोंदणी, अमरावती विभागा आघाडीवर

By नितीन चौधरी | Updated: September 14, 2023 16:40 IST

३१ ऑगस्पटर्यंत राज्यात ३३४ दस्त

पुणे : केवळ एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकीची हक्काची अदलाबदल करण्याची संधी सलोखा योजनेद्वारे देण्यात आली असून राज्यात आतापर्यंत ३३४ दस्तांची नोंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तब्बल २ कोटी ८८ लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली आहे. सर्वाधिक नोंदणी अमरावती विभागात १०७ दस्तांची नोंद झाली आहे.

जमीन हा महत्त्वाचा व संवेदनशील विषय आहे. जमिनीच्या वादामुळे नात्यांमध्ये दुराव्याची भावना निर्माण होत असते. या वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. हे टाळण्यासाठी व आपापसांत सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना महसूल विभागाने राबवली आह़े पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तूस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहीत पंचनामा नोंदवहीमध्ये करणे आवश्यक राहील.

राज्य सरकारने ३ जानेवारीला अधिसूचना काढून ही योजना लागू केली होती. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली असून केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क तर नोंदणी शुल्कदेखील १ हजार रुपये असे दोन हजार रुपये आकारले जातात. या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र शेतकरी कमीत कमी १२ वर्षांपासून बाधित असला पाहिजे. तसेच दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग, सत्ताप्रकार, पुनर्वसन, आदिवासी, कूळ आदी बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशी अट दस्त करताना घालण्यात आली आहे.

३१ ऑगस्पटर्यंत राज्यात ३३४ दस्त

या योजनेंतर्गत राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत ३३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. प्रत्येकी ३ लाख ३४ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नागरिकांना भरावे लागले असून, या ३३४ दस्तांसाठी मुद्रांक शुल्कात २ कोटी ४८ लाख १७ हजार १२२ रुपये तर नोंदणी शुल्कात ४० लाख ३२ हजार ६७९ रुपये माफी मिळाली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी