शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

डाळिंब बागायतदारांची दलालांकडून लुबाडणूक, बारामती, इंदापूरच्या शेतक-यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:05 AM

डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत.

बारामती : डाळिंब बागायतदारांना लुबाडण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील दलाली संपवल्याचा कितीही दावा केला असला तरी शेतक-यांच्या कष्टाच्या कमाईवर हात मारण्याचे प्रकार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये नित्याने घडून येत आहेत. याचा फटका बारामती, इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकºयांना बसला आहे.बारामती, इंदापूर तालुक्यांतील जिरायती-बागायत पट्ट्यात हक्काची फळबाग म्हणून डाळिंब बागांकडे पाहिले जाते. एका रात्रीत कोट्यधीश करणारे पीक म्हणूनही डाळिंबाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊ लागली होती. मात्र कष्टाने पिकविलेले फळ बाजार समितीमध्ये अक्षरश: दलालांच्या घशात घालावे लागत आहे. शेतकºयाने बाजार समितीच्या आवारात माल आणला, की दलाल चांगल्या गुणवत्तेच्या मालाच्या सहा प्रकारात वर्गवारी करतो. ही वर्गवारी शेतकºयांच्या खर्चाने केली जाते. तत्पूर्वी दलाल ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमधील कॅरेटमधून स्वत:च्या कॅरेटमध्ये माल उतरवून घेतो. या उतरवणुकीचे भाडेदेखील शेतकºयांच्या माथी मारले जाते. तसेच दलाल स्वत:च्या कॅरेटचे भाडेदेखील शेतकºयांकडून हमाली, तोलाई, भराईमध्ये ही रक्कम वसूल केली जाते.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात डाळिंबाचे बाजार९५ रुपयांपर्यंत होते. मात्र अवघ्या २० दिवसांतच डाळिंबाचे बाजार सरासरी २० ते २४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.चांगल्या गुणवत्तेच्या फळांची सहा प्रकारात वर्गवारी केली जाते. या वर्गवारीच्या प्रकारावरदेखील डाळिंब बागायतदारांनी शंका व्यक्त केली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये मालाची फक्त तीन प्रकारांत वर्गवारी केली जाते. मग पुणे बाजार समितीमध्ये सहा प्रकारांत वर्गवारी का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला आहे. ही वर्गवारी नेमकी कोणत्या आधारावर केली जाते याची उत्तरे दलाल शेतकºयांना देत नाही. साधारण एका एकर डाळिंब बागेसाठी १ लाखाच्या आसपासखर्च येतो. महिन्याच्या सुरुवातीला असणारा दर आता जवळपास ७० ते ८० टक्क्यांनी उतरल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चदेखील निघेनासा झाला आहे.बाजार पाडण्यासाठी अजब कारणे...बाजार उतरण्याची अजब कारणे दलाल शेतकºयांना देत आहेत. मध्यंतरी धुराच्या ढगामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण खराब झाले होते. याचा फायदा घेत पुण्यातील दलाल, व्यापाºयांनी दिल्लीत जास्त धुके पडल्याने बाजार उतरले असल्याचे हास्यास्पद कारण दिले होते.मात्र बाजार समितीमध्ये येणारी संपूर्ण आवक व्यापारी मातीमोलकिमतीने खरेदी करीत होते. मात्र किरकोळ विक्रीचे बाजार मात्र अजूनही चढेच राहिले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यापारी व दलाल बाजार पाडण्यासाठी फालतू कारणे देत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी