शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डाळिंब व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 03:14 IST

१५ ते १७ कोटींची वसुली; प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती उघड

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब यार्डमधील आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून सुमारे १५ ते १७ कोटी रुपये अतिरिक्त पैसे वसुल केल्याप्रकरणी दोन आडत्यांचे परवाना निलंबित करण्यात आले आहेत. चारपैकी दोन आडत्यांचे परवाना निलंबित केले असले तरी उर्वरित दोन आडत्यांवर कारवाईला कधी मुहूर्त मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.बाजारातील डाळिंब यार्डातील चार आडत्यांनी हमाली आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात केली. यात शेतकरी आणि खरेदीदारांची सुमारे १५ ते १७ कोटींची लूट झाल्याचे बाजार समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने मार्केट यार्डातील संशयित आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा निर्णय घेतला. आतापर्यंत ४१ संशयित आडत्यांची दफ्तरे ताब्यात घेतली आहेत. तसेच, दफ्तर तपासणीसाठी खासगी ८ सनदी लेखापालांची (सीए) नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे दफ्तर तपासणी सुरू आहे. आज दोन आडत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. दफ्तर तपासणीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.अंतिम अहवाल लवकरच समोर येणारशेतकरी आणि खरेदीदार यांच्या पट्टीतून अवैध रक्कम कपात केल्याप्रकरणी आडत्यांच्या दफ्तर तपासणीचा अंतिम अहवाल लवकरच समोर येईल. अंतिम अहवालात आडत्यांनी शेतकरी आणि खरेदीदार यांची किती अवैध रक्कम कपात केली आणि एकूण आकडा समोर येईल. त्यानंतर संबंधितांना त्यांचे पैसे दिले जातील, असे देशमुख यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी