शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

मुंबईतील अंबानी इस्टेटवर धडकणार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गोरगरीबांचे व्यवसाय घेण्याची बड्या उद्योजकांची भूक कधी भागणार याची विचारणा करण्यासाठी मुंबईतल्या अंबानी इस्टेटवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गोरगरीबांचे व्यवसाय घेण्याची बड्या उद्योजकांची भूक कधी भागणार याची विचारणा करण्यासाठी मुंबईतल्या अंबानी इस्टेटवर राज्यातील शेतकरी संघटना येत्या मंगळवारी (दि. २२) मोर्चा काढणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ते बुधवारी (दि. १६) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, प्रतिभा शिंदे, राहुल पोकळे आदी यावेळी उपस्थित होते

शेट्टी म्हणाले, “गेल्या २० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात शेती व्यवसाय कंपन्यांना समजला. त्यामुळेच अदानी, अंबानी यांना हा व्यवसाय देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.”

केंद्राने मंजूर केलेले तिन्ही कायदे आणि प्रस्तावित वीज विधेयक रद्द व्हावे, उसाचा एफआरपी कायदा सर्व पिकांना लागू करावा यासाठी सर्व शेतकरी संघटना एक होऊन लढत आहेत. तरीही मोदी का अडून बसले आहेत. सरकार मागे हटत नाही तोवर शेतकरी मागे हटणार नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

डॉ. आढाव म्हणाले, “मोदींनी शेतकऱ्यांची जबाबदारी झटकली आहे. तशी हमीभावाची जबाबदारी उद्योजकांवर ढकलली आहे. जुने जे कायदे आहेत ते रद्द करा असे शेतकरी म्हणत आहेत. यात दोष जुन्या कायद्याचा नसून केंद्राच्या नाकारतेपणाचा आहे.” डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवला आहे. या संदर्भात शेट्टी म्हणाले, “आपल्यातले वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे. अजून कोणाला आंदोलन करायचे असेल ते करावे. पंतप्रधानांच्या घरासमोर धरणे धरावे. याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही.”