शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबईतील अंबानी इस्टेटवर धडकणार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गोरगरीबांचे व्यवसाय घेण्याची बड्या उद्योजकांची भूक कधी भागणार याची विचारणा करण्यासाठी मुंबईतल्या अंबानी इस्टेटवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गोरगरीबांचे व्यवसाय घेण्याची बड्या उद्योजकांची भूक कधी भागणार याची विचारणा करण्यासाठी मुंबईतल्या अंबानी इस्टेटवर राज्यातील शेतकरी संघटना येत्या मंगळवारी (दि. २२) मोर्चा काढणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. ते बुधवारी (दि. १६) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, प्रतिभा शिंदे, राहुल पोकळे आदी यावेळी उपस्थित होते

शेट्टी म्हणाले, “गेल्या २० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात शेती व्यवसाय कंपन्यांना समजला. त्यामुळेच अदानी, अंबानी यांना हा व्यवसाय देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.”

केंद्राने मंजूर केलेले तिन्ही कायदे आणि प्रस्तावित वीज विधेयक रद्द व्हावे, उसाचा एफआरपी कायदा सर्व पिकांना लागू करावा यासाठी सर्व शेतकरी संघटना एक होऊन लढत आहेत. तरीही मोदी का अडून बसले आहेत. सरकार मागे हटत नाही तोवर शेतकरी मागे हटणार नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

डॉ. आढाव म्हणाले, “मोदींनी शेतकऱ्यांची जबाबदारी झटकली आहे. तशी हमीभावाची जबाबदारी उद्योजकांवर ढकलली आहे. जुने जे कायदे आहेत ते रद्द करा असे शेतकरी म्हणत आहेत. यात दोष जुन्या कायद्याचा नसून केंद्राच्या नाकारतेपणाचा आहे.” डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवला आहे. या संदर्भात शेट्टी म्हणाले, “आपल्यातले वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हावे. अजून कोणाला आंदोलन करायचे असेल ते करावे. पंतप्रधानांच्या घरासमोर धरणे धरावे. याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही.”