शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वन विभागाविरोधात एकवटले शेतकरी, अतिक्रमणे हटविल्याने शेतकरी आक्रमक, पूर्वकल्पना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:05 IST

मागील ७० वर्षांपासून तालुक्यातील शेकडो शेतकरी कुटुंबातील लहानांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत रात्रंदिवस कष्ट करून, शेतकऱ्यांनी शेती केली होती.

इंदापूर  - मागील ७० वर्षांपासून तालुक्यातील शेकडो शेतकरी कुटुंबातील लहानांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत रात्रंदिवस कष्ट करून, शेतकऱ्यांनी शेती केली होती. ती शेती मागील ४० ते ५० वर्षांपासून लेकराप्रमाणे जपली होती. मात्र, इंदापूरच्या वन अधिकाऱ्यांनी बुलडोझरच्या साहाय्याने काही तासांतच उद्ध्वस्त केली. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.इंदापूर तालुक्यात मागील ७० वर्षांपासून इंदापूर महसूल विभागाने तालुक्यातील शेतकºयांना वनजमिनी कसण्यासाठी दिल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या चार पिढ्यांनी त्यावर शेती केली. त्यामुळे २००७-०८ पर्यंत सातबारा उताºयावर शेतकºयांची शासनदरबारी नोंद होती. मात्र शेतक-यांना कोणतीही नोटीस न देता त्यांच्या सातबारा उताºयावर परस्पर महाराष्ट्र वन संरक्षित जमीन असा शेरा टाकण्यात आला आहे.इंदापूर वन विभागाने शेतक-यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही, कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. अशिक्षित शेतकºयांना सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, असा कागद दाखवून अन्यायकारक कारवाई केली व नगदी पिके जमीनदोस्त केली. १०० ते १५० पोलिसांचा फौजफाटा आणून शेतक-यांवर दबाव टाकला, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनावणे यांनी केला आहे.याबाबत राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना २८ फेब्रुवारी २०१९ रोजी मंत्रालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जोगेंद्र कवाडे, संजय सोनावणे यांनी भेट घेऊन निवेदन दिले व इंदापूर तालुक्यात दुष्काळ असल्याने अतिक्रमणे काढण्याचे काम थांबविण्यासाठी विनंती केली होती. त्या वेळी कारवाई थांबली; मात्र दोन दिवसांनी पुन्हा ही कारवाई आजोती येथे चालू झाली.राज्य वनमंत्री यांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते की, १९८० पूर्वीच्या वनजमिनी वहिवाटदार यांच्या जमिनीवर कारवाई करण्यात येणार नाही. १९७० पूर्वीच्या वनजमिनी संदर्भांत केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. १९८० नंतरच्या जमिनी असतील तरी आम्ही ते कायम करणार आहोत. मात्र, त्यांच्या आश्वासनांना इंदापूर वन अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे, असाही आरोप संजय सोनावणे यांनी केला आहे.वन विभागातील एकाही अधिकाºयाला इंदापूरची एकूण वनजमीन किती, हेच माहिती नाही..!इंदापूर वनपरिक्षेत्र कार्यालयात वनसंरक्षक अधिकाºयांना, इंदापूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील एकूण वनजमीन किती, असे विचारले असता आम्हांला नक्की सांगता येणार नाही, अशा प्रकारचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी वनविभागाच्या जमिनीवर धनदांडग्या लोकांनी कब्जा केला असून, वनअधिकारी राहुल काळे यांना हाताशी धरून राजकीय लोकांनी वनविभागाची जमीन विकायला काढली आहे, अशी चर्चा इंदापूरमध्ये रंगली आहे.आंदोलन करणार...1इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे, न्हावी, शेळगाव, डाळज नं. १, डाळज नं. ३, बिजवडी, गागरगाव, बाभुळगाव, आजोती, सुगाव, इंदापूर, लासुर्णे, भरणेवाडी, निर-निमगाव, निमसाखर, माळवाडी, पळसदेव, बांडेवाडी इत्यादी गावांमध्ये शेतकºयांना कोणतीही सूचना न देता थेट १०० ते १५० पोलिसांचा फौजफाटा घेऊन धडक कारवाई करण्यात आली.2तालुक्यातील वन विभागाचे जमिनीवरील एकूण ६२५ एकर पेक्षा जास्त शेतजमिनीतील शेतमाल उद्ध्वस्त करून ते रिकामे करून अतिक्रमण हटविण्यात आले आहे. शेळगाव या ठिकाणी तर वन विभागाचे अधिकारी कोयते घेऊन एका शेतकºयाच्या द्राक्षशेतात घुसले आणि चार-पाच एकर तोडणीला आलेला द्राक्षबाग तोडून टाकला असेही समजले.वन कायद्यानुसार व वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कारवाई केली आहे. या कारवाईसाठी मुंबई राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ११ चे १०० पोलीस व वन विभागाचे ५० वनसरंक्षक व काही अधिकारी यांनी मिळून कारवाई केली आहे व वन विभाग मशिनद्वारे सर्वेक्षण चालूच आहे. आणि कारवाई अशीच चालू राहणार आहे, आतापर्यंत १०० पेक्षा अधिक जणांवर वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- राहुल काळे, वन अधिकारी, इंदापूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती