शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: September 9, 2016 01:50 IST

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने या परिसरातील शेतीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही भागात पिकं धोक्यात आल्याने निरा डावा कालवा, पुरंदर उपसा व जनाई शिरसाई या योजनेतून पाण्याची मागणी वाढली आहे. शेतकरी आक्रमक होत असून गुरूवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना ठिय्या मारला. पाटबंधारे कार्यालयासमोर मारला ठिय्याभवानीनगर : नीरा डावा कालव्याचे पाणी मिळण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सणसरसह ११ गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी सणसर पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. पाटबंधारे बारामती विभागाचे उपअभियंता ए. आर. भोसले यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांनी भोसले यांना पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. १५ सप्टेंबरपर्यंत पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.नीरा डावा कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेवर चिखली, कुरवली, जांब, मानकरवाडी, उद्धट, तावशी, पवारवाडी, उदमाईवाडी, हिंगणेवाडी, सपकळवाडी, सणसर या ११ गावांमधील शेती अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविली आहे. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने येथील शेतकऱ्यांनी पिके जपली आहेत. नीरा डावा कालव्याच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून आहे. मात्र, कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. शेतीपिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.या वेळी येथील शेतकरी आणि संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजी थोरात म्हणाले, की परिसरातील शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीत उन्हाळा पार केला. सध्या या भागांमधील विहिरींची पाणीपातळी घटली आहे. ५ ते १० मिनिटे विद्युतपंप सुरू राहतो. त्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होते. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. कालवा समितीच्या बैठकीत टेल टू हेड पाणी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर आणि बारामतीला पाणी मिळाले; मात्र केवळ ३६ वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.या वेळी मारुतराव वणवे, लालासाहेब सपकळ, शिवाजीराव रूपनवर, दिलीप पांढरे, रवींद्र कदम, दिलीप निंबाळकर, एल. पी. भोईटे, अमर कदम, सुभाष चव्हाण, प्रमोद थोरात आदी उपस्थित होते. ( वार्ताहर )जनाई उपसाच्या पाण्याची प्रतीक्षावासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अद्यापही टंचाई भासत असून, या भागात वर्षभरापासून सुरू असलेले पाण्याचे टँकर सुरूच आहेत. या भागातील जनता जनाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, रोटी, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी ही गावे पुरेशा पावसाअभावी सतत दुष्काळाच्या छायेत येत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या तर सोडाच, परंतु पिण्याच्या पाण्याची कायमच टंचाई जाणवत असल्याने सततच्या दुष्काळाने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. अनेक गावांना आजही शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. तर, वासुंदे गावासाठी (दि.४) रोजी सुरू झालेला टँकर वर्षभरापासून बंदच झालेला नसून येथील जनता पाण्यासाठी आजही टँकरवर अवलंबून आहे. सततच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने पाण्याचे सर्व स्रोत ऐन पावसाळ्यातही कोरडे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा व पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी या भागातील तलाव व बंधाऱ्यांमधून जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास पाणीटंचाई कमी होऊन जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने या भागातील जनता जनाईच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ( वार्ताहर )