शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

By admin | Updated: September 9, 2016 01:50 IST

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी

यावर्षी पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. धरणं ओव्हरफूल झाली मात्र पश्चिम भागात. पूर्व भागातील बारामती, इंदापूर, पुरंदर व दौैंड या तालुक्यात मात्र पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने या परिसरातील शेतीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. काही भागात पिकं धोक्यात आल्याने निरा डावा कालवा, पुरंदर उपसा व जनाई शिरसाई या योजनेतून पाण्याची मागणी वाढली आहे. शेतकरी आक्रमक होत असून गुरूवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांना ठिय्या मारला. पाटबंधारे कार्यालयासमोर मारला ठिय्याभवानीनगर : नीरा डावा कालव्याचे पाणी मिळण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सणसरसह ११ गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी सणसर पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. पाटबंधारे बारामती विभागाचे उपअभियंता ए. आर. भोसले यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी शेतकऱ्यांनी भोसले यांना पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. १५ सप्टेंबरपर्यंत पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.नीरा डावा कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेवर चिखली, कुरवली, जांब, मानकरवाडी, उद्धट, तावशी, पवारवाडी, उदमाईवाडी, हिंगणेवाडी, सपकळवाडी, सणसर या ११ गावांमधील शेती अवलंबून आहे. पावसाने पाठ फिरविली आहे. उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने येथील शेतकऱ्यांनी पिके जपली आहेत. नीरा डावा कालव्याच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून आहे. मात्र, कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. शेतीपिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.या वेळी येथील शेतकरी आणि संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष तानाजी थोरात म्हणाले, की परिसरातील शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीत उन्हाळा पार केला. सध्या या भागांमधील विहिरींची पाणीपातळी घटली आहे. ५ ते १० मिनिटे विद्युतपंप सुरू राहतो. त्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होते. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. कालवा समितीच्या बैठकीत टेल टू हेड पाणी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर आणि बारामतीला पाणी मिळाले; मात्र केवळ ३६ वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.या वेळी मारुतराव वणवे, लालासाहेब सपकळ, शिवाजीराव रूपनवर, दिलीप पांढरे, रवींद्र कदम, दिलीप निंबाळकर, एल. पी. भोईटे, अमर कदम, सुभाष चव्हाण, प्रमोद थोरात आदी उपस्थित होते. ( वार्ताहर )जनाई उपसाच्या पाण्याची प्रतीक्षावासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागातील नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अद्यापही टंचाई भासत असून, या भागात वर्षभरापासून सुरू असलेले पाण्याचे टँकर सुरूच आहेत. या भागातील जनता जनाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.वासुंदे, हिंगणीगाडा, जिरेगाव, रोटी, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी ही गावे पुरेशा पावसाअभावी सतत दुष्काळाच्या छायेत येत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या तर सोडाच, परंतु पिण्याच्या पाण्याची कायमच टंचाई जाणवत असल्याने सततच्या दुष्काळाने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. अनेक गावांना आजही शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. तर, वासुंदे गावासाठी (दि.४) रोजी सुरू झालेला टँकर वर्षभरापासून बंदच झालेला नसून येथील जनता पाण्यासाठी आजही टँकरवर अवलंबून आहे. सततच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने पाण्याचे सर्व स्रोत ऐन पावसाळ्यातही कोरडे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा व पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी या भागातील तलाव व बंधाऱ्यांमधून जनाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास पाणीटंचाई कमी होऊन जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने या भागातील जनता जनाईच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ( वार्ताहर )