शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आठवडेबाजारात व्यापाऱ्यांकडूनच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 05:18 IST

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले.

पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाची परवानगी न घेताच काही नगरसेवकांनी आठवडेबाजार सुरू केले आहेत. पणन विभागाचे या बाजारांवर नियंत्रण नसल्याने बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापारीच भाजीपाला विक्री करीत आहेत, त्यामुळे शेतकरी आठवडेबाजाराचा ‘बाजार उठला’ असल्याचे सध्याचे चित्र आहे.शेतकºयांना स्वत:ची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी; तसेच व्यापाºयांना कमी दराने भाजीपाल्याची विक्री न करता शेतकºयांचे लहान-मोठे गट स्थापन करून शेतीमालाची विक्री करता यावी, या हेतूने शहरातील विविध भागांत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाच्या मान्यतेने आठवडेबाजार सुरू करण्यात आले. आठवडेबाजारात भाजीपाला विक्रीस बसणाºया विक्रेत्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये आकारले जातात. त्यामुळे काहींनी खोट्या कंपनी स्थापन करून आठवडेबाजार हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे. काहीही न करता पैसे कमावता येत असल्याने बाजार चालवण्यास मिळावा, यावरून चढाओढ लागली आहे.पणन विभागाच्या परवानगीशिवाय एकही शेतकरी आठवडेबाजार सुरू करता येत नाही. मात्र, पणन विभाग आणि पालिकेला विचारात न घेता थेट शेतकरी आठवडेबाजार थाटून त्यातून पैसा कमावला जात आहे. पालिकेने आपल्या हद्दीत सुरू झालेल्या आठवडेबाजारावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पालिकेच्या अधिकाºयांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.नियमानुसार शेतकरी आठवडेबाजाराचे आयोजन करण्याची परवानगी मिळालेल्या बाजार आयोजक कंपन्यांना काही नगरसेवकांनी हुसकावून लावले असल्याची माहिती समोर येत आहे. पणन विभागकडूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पणन विभागाच्या परवानगीने सुरू झालेल्या बाजारात विक्रीसाठी येणाºया प्रत्येक विक्रेत्याची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकरीच आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. व्यापाºयांना या बाजारात थारा मिळत नाही. मात्र, अनेक नगरसेवकांनी आठवडेबाजारांवर नियंत्रण प्रस्थापित करून शेतकरी आठवडेबाजाराच्या उद्देशाला हरताळ फासला आहे.महापालिका आणि पणन विभाग यांच्यात अद्याप शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्याबाबतचे धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत सुमारे १२० आठवडेबाजार बेकायदेशीरपणे सुरू झाले. कोथरूड, बाणेर आणि पिंपळे सौदागर येथे आमच्या कोरडवाहू उथ्थान फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून आठवडेबाजार भरविला जात होता. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला हुसकावून लावले. स्वत: आठवडेबाजार ताब्यात घेऊन बाजारात शेतकºयांऐवजी व्यापारी बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील नाते तुटले. त्यामुळे पालिका व पणन विभागाने यात लक्ष देऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.- सागर उरमुडे, संचालक, कोरडवाहू उथ्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अहमदनगर

टॅग्स :Puneपुणे