शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतकरी आठवडेबाजारात व्यापाऱ्यांकडूनच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 05:18 IST

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले.

पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा आणि ग्राहकांना ताजा व कमी दरात भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शासनाने शेतकरी आठवडेबाजार सुरू केले. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाची परवानगी न घेताच काही नगरसेवकांनी आठवडेबाजार सुरू केले आहेत. पणन विभागाचे या बाजारांवर नियंत्रण नसल्याने बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापारीच भाजीपाला विक्री करीत आहेत, त्यामुळे शेतकरी आठवडेबाजाराचा ‘बाजार उठला’ असल्याचे सध्याचे चित्र आहे.शेतकºयांना स्वत:ची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी; तसेच व्यापाºयांना कमी दराने भाजीपाल्याची विक्री न करता शेतकºयांचे लहान-मोठे गट स्थापन करून शेतीमालाची विक्री करता यावी, या हेतूने शहरातील विविध भागांत पालिका प्रशासन व पणन संचालक कार्यालयाच्या मान्यतेने आठवडेबाजार सुरू करण्यात आले. आठवडेबाजारात भाजीपाला विक्रीस बसणाºया विक्रेत्यांकडून प्रत्येकी ३०० रुपये आकारले जातात. त्यामुळे काहींनी खोट्या कंपनी स्थापन करून आठवडेबाजार हे उत्पन्नाचे साधन बनवले आहे. काहीही न करता पैसे कमावता येत असल्याने बाजार चालवण्यास मिळावा, यावरून चढाओढ लागली आहे.पणन विभागाच्या परवानगीशिवाय एकही शेतकरी आठवडेबाजार सुरू करता येत नाही. मात्र, पणन विभाग आणि पालिकेला विचारात न घेता थेट शेतकरी आठवडेबाजार थाटून त्यातून पैसा कमावला जात आहे. पालिकेने आपल्या हद्दीत सुरू झालेल्या आठवडेबाजारावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पालिकेच्या अधिकाºयांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.नियमानुसार शेतकरी आठवडेबाजाराचे आयोजन करण्याची परवानगी मिळालेल्या बाजार आयोजक कंपन्यांना काही नगरसेवकांनी हुसकावून लावले असल्याची माहिती समोर येत आहे. पणन विभागकडूनही त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पणन विभागाच्या परवानगीने सुरू झालेल्या बाजारात विक्रीसाठी येणाºया प्रत्येक विक्रेत्याची तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकरीच आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. व्यापाºयांना या बाजारात थारा मिळत नाही. मात्र, अनेक नगरसेवकांनी आठवडेबाजारांवर नियंत्रण प्रस्थापित करून शेतकरी आठवडेबाजाराच्या उद्देशाला हरताळ फासला आहे.महापालिका आणि पणन विभाग यांच्यात अद्याप शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्याबाबतचे धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत सुमारे १२० आठवडेबाजार बेकायदेशीरपणे सुरू झाले. कोथरूड, बाणेर आणि पिंपळे सौदागर येथे आमच्या कोरडवाहू उथ्थान फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून आठवडेबाजार भरविला जात होता. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला हुसकावून लावले. स्वत: आठवडेबाजार ताब्यात घेऊन बाजारात शेतकºयांऐवजी व्यापारी बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यातील नाते तुटले. त्यामुळे पालिका व पणन विभागाने यात लक्ष देऊन शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.- सागर उरमुडे, संचालक, कोरडवाहू उथ्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, अहमदनगर

टॅग्स :Puneपुणे