शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

दौंडच्या दुष्काळी भागात टंचाईच्या झळा!

By admin | Updated: April 3, 2015 03:20 IST

शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत

खोर : शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत आहे. दौंडच्या दुष्काळी पश्चिम पट्टयातील ही स्थिती असून येथील ग्रामस्थ आताच पाणी पाणी करीत आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी या परिसरातील शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फळबागा जगविण्याची धडपड करीत आहेत. उन्हाळा चालू होण्याच्या आधीच शेतकरी कांदा, रब्बी पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या कांद्याच्या कमी होत असलेल्या बाजारभावामुळे तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याची होत असलेली कमतरता पाहता, दौंडच्या दुष्काळी भागामधील शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. दर वर्षी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तरावर रोजगार हमी योजना, ओढा खोलीकरण, नाला खोलीकरण, ओढ्यावर कोल्हापुरी पद्धतीचे तसेच सिमेंटचे बंधारे बांधून पावसाळ्याच्या कालावधीमधील वाहून जाणारे पाणी आडवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची कामे हाती घेण्याची धडपड सुरू होत असते. या भागातील पडवी, कुसेगाव, माळवाडी, देऊळगावगाडा, नारायणबेट, खोर, वासुंदे, रोटी या गावांचा मार्च-एप्रिल महिन्यापासूनच पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे. या भागात कार्यान्वित असलेल्या सिंचन क्षेत्रामधील योजना मात्र शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत. जनाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना अशा प्रकारच्या सिंचन योजनांकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला गेला, तर या भागामधील उन्हाळाच्या कालावधीमधील होत असलेली पाण्याची समस्या कमी हाईल, अशी अपेक्षा या भागामधील शेतकरीवर्गाची आहे.