शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

दौंडच्या दुष्काळी भागात टंचाईच्या झळा!

By admin | Updated: April 3, 2015 03:20 IST

शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत

खोर : शेतीचापाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कोरडे पडलेले ओढे, शेततळी, तलाव, विहिरी आदी पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागत आहे. दौंडच्या दुष्काळी पश्चिम पट्टयातील ही स्थिती असून येथील ग्रामस्थ आताच पाणी पाणी करीत आहेत. पाण्याची बचत करण्यासाठी या परिसरातील शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फळबागा जगविण्याची धडपड करीत आहेत. उन्हाळा चालू होण्याच्या आधीच शेतकरी कांदा, रब्बी पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सध्या कांद्याच्या कमी होत असलेल्या बाजारभावामुळे तसेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याची होत असलेली कमतरता पाहता, दौंडच्या दुष्काळी भागामधील शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. दर वर्षी शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तरावर रोजगार हमी योजना, ओढा खोलीकरण, नाला खोलीकरण, ओढ्यावर कोल्हापुरी पद्धतीचे तसेच सिमेंटचे बंधारे बांधून पावसाळ्याच्या कालावधीमधील वाहून जाणारे पाणी आडवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची कामे हाती घेण्याची धडपड सुरू होत असते. या भागातील पडवी, कुसेगाव, माळवाडी, देऊळगावगाडा, नारायणबेट, खोर, वासुंदे, रोटी या गावांचा मार्च-एप्रिल महिन्यापासूनच पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली आहे. या भागात कार्यान्वित असलेल्या सिंचन क्षेत्रामधील योजना मात्र शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत. जनाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना अशा प्रकारच्या सिंचन योजनांकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला गेला, तर या भागामधील उन्हाळाच्या कालावधीमधील होत असलेली पाण्याची समस्या कमी हाईल, अशी अपेक्षा या भागामधील शेतकरीवर्गाची आहे.