शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जिल्ह्यातील नद्यांना फास जलपर्णींचा

By admin | Updated: February 5, 2017 03:21 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने

शेलपिंपळगाव : पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने अतिक्रमण केल्यामुळे हिवाळा संपता संपता नद्यांचा ताबा घेत असून पावसाळ्यापर्यंत त्यांचे साम्राज्य नद्यांवर राहते. परिणामी जीवनवाहिन्यांचा श्वास कोंडला जाऊन जलप्रदूषण फोफावत चालले आहे.जलपर्णींमुळे पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा निर्माण होत असल्याने पाण्यातील इतर जीवांसाठी धोकादायक ठरत आहे. कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाणी, गटारांमधील अस्वच्छ पाणी तसेच दररोजच्या वापरातील पाणी अवैधरित्या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने नद्यांमधील पाण्याचे अगोदरच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्रशासनाने नद्यांमधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात नद्यांमधील पाण्याचा वर्षभर शेती सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी उपयोग केला जातो.कारखान्यांमधील रसायनमिश्रीत, मलमूत्र अशुद्ध पाणी बेकायदेशीररित्या नद्यांच्या प्रवाहात सोडले जात असल्याने पाण्याच्या पृष्ठभागावर जलपर्णींचा विळखा पसरण्यास सुरुवात होते. दुर्गंधीमुळे त्रस्तनदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठून राहिल्यामुळे केवळ डासांचीच निर्मिती होत नसून, एकाच जागी साठलेले दूषित पाणी व त्यातील जलपर्णींमुळे दुर्गंधी पसरली जात आहे. उग्र अशा दुर्गंधीमुळे नदीशेजारील रहिवाशांना घरात बसणेही मुश्कील होत आहे. डास आणि दुर्गंधी अशा दुहेरी त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येकडे आरोग्य विभागाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होते.