शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नद्यांना फास जलपर्णींचा

By admin | Updated: February 5, 2017 03:21 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने

शेलपिंपळगाव : पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा, इंद्रायणी तसेच अन्य बहुतांशी सर्वच जीवनवाहिन्यांना जलपर्णींचा फास बसलेला आहे. प्रदूषणाच्या जोडीला जलपर्णींच्या संकटाने अतिक्रमण केल्यामुळे हिवाळा संपता संपता नद्यांचा ताबा घेत असून पावसाळ्यापर्यंत त्यांचे साम्राज्य नद्यांवर राहते. परिणामी जीवनवाहिन्यांचा श्वास कोंडला जाऊन जलप्रदूषण फोफावत चालले आहे.जलपर्णींमुळे पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा निर्माण होत असल्याने पाण्यातील इतर जीवांसाठी धोकादायक ठरत आहे. कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाणी, गटारांमधील अस्वच्छ पाणी तसेच दररोजच्या वापरातील पाणी अवैधरित्या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने नद्यांमधील पाण्याचे अगोदरच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. प्रशासनाने नद्यांमधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात नद्यांमधील पाण्याचा वर्षभर शेती सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी उपयोग केला जातो.कारखान्यांमधील रसायनमिश्रीत, मलमूत्र अशुद्ध पाणी बेकायदेशीररित्या नद्यांच्या प्रवाहात सोडले जात असल्याने पाण्याच्या पृष्ठभागावर जलपर्णींचा विळखा पसरण्यास सुरुवात होते. दुर्गंधीमुळे त्रस्तनदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठून राहिल्यामुळे केवळ डासांचीच निर्मिती होत नसून, एकाच जागी साठलेले दूषित पाणी व त्यातील जलपर्णींमुळे दुर्गंधी पसरली जात आहे. उग्र अशा दुर्गंधीमुळे नदीशेजारील रहिवाशांना घरात बसणेही मुश्कील होत आहे. डास आणि दुर्गंधी अशा दुहेरी त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येकडे आरोग्य विभागाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होते.