शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वैरणीचे घटले प्रमाण, नगदी पिकांमुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:46 IST

नगदी पिकांमुळे परिणाम : खरीब, रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र घटले

पुणे : शेतकऱ्यांकडून अधिकाधिक नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असल्याने वैरणपिकांच्या क्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे वैरणक्षेत्रात वाढ करून वैरणीचे उत्पादन वाढविणे, कडबाकुट्टी यंत्राचा वापर करणे, पावसाळ्यात वैरणीचे अतिरिक्त उत्पादन करून मूरघास स्वरूपात साठवण करणे आणि अपारंपरिक वैरणीचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील लागवडयोग्य क्षेत्राचे निवासी क्षेत्रामध्ये रुपांतर होत असल्याने पेरणीक्षेत्र कमी होत आहे. त्याचप्रमाणे शेतकºयांचा कापूस, ऊस, फळझाडे व तेलबिया आदी नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यातील काही नगदी पिकांचा वैरणीसाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या आर्थिक पाहणीनुसार राज्यातील प्रमुख पिकांच्या पेरणीक्षेत्रात बदल होत आहे. त्यात खरीप ज्वारीमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली असून खरीप बाजरीत १९ टक्क्यांनी, मका उत्पादनात ५ टक्क्यांनी, तर रब्बी ज्वारीमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच गव्हाच्या उत्पादनात ३९ टक्क्यांनी घट झाली असून सोयाबीन पिकाच्या उत्पादनात १२ टक्क्यांनी, कापसात ५ टक्क्यांनी आणि उसाच्या उत्पादनात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कडबाकुट्टीचा वापर केल्यास वैरणीची ३० टक्के बचत होऊ शकते. परंतु, कडबाकुट्टीचा वापर न करता तशीच वैरण जनावरांना टाकली जाते. परिणामी जनावरांच्या शेणमूत्रामुळे वैरण खराब होते. त्यामुळे वैरण पिकांचे उत्पादन वाढवून आणि अधिकाधिक वैरणीची योग्य प्रकारे साठवणूक करून दिवसेंदिवस होत असणारी वैरणीची तूट भरून काढावी लागणार आहे. त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी केले आहे.शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, फळे आदी विक्रीसाठी शहरात जात असल्यामुळे त्यांचा टाकाऊ भाग वैरण म्हणून उपयोगात न येता शहराच्या कचरा कुंडीत जमा होत आहे. तसेच गावातील सामायिक जमीन, गायरान, देवराई आदीमध्ये अतिक्रमण वाढले आहे. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आगीमुळे गवताच्या व कडब्यांच्या गंज्यांना आग लागून नुकसान होत आहे. 

टॅग्स :Puneपुणे