शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वैरणीचे घटले प्रमाण, नगदी पिकांमुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:46 IST

नगदी पिकांमुळे परिणाम : खरीब, रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र घटले

पुणे : शेतकऱ्यांकडून अधिकाधिक नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असल्याने वैरणपिकांच्या क्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे वैरणक्षेत्रात वाढ करून वैरणीचे उत्पादन वाढविणे, कडबाकुट्टी यंत्राचा वापर करणे, पावसाळ्यात वैरणीचे अतिरिक्त उत्पादन करून मूरघास स्वरूपात साठवण करणे आणि अपारंपरिक वैरणीचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील लागवडयोग्य क्षेत्राचे निवासी क्षेत्रामध्ये रुपांतर होत असल्याने पेरणीक्षेत्र कमी होत आहे. त्याचप्रमाणे शेतकºयांचा कापूस, ऊस, फळझाडे व तेलबिया आदी नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यातील काही नगदी पिकांचा वैरणीसाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या आर्थिक पाहणीनुसार राज्यातील प्रमुख पिकांच्या पेरणीक्षेत्रात बदल होत आहे. त्यात खरीप ज्वारीमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली असून खरीप बाजरीत १९ टक्क्यांनी, मका उत्पादनात ५ टक्क्यांनी, तर रब्बी ज्वारीमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच गव्हाच्या उत्पादनात ३९ टक्क्यांनी घट झाली असून सोयाबीन पिकाच्या उत्पादनात १२ टक्क्यांनी, कापसात ५ टक्क्यांनी आणि उसाच्या उत्पादनात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कडबाकुट्टीचा वापर केल्यास वैरणीची ३० टक्के बचत होऊ शकते. परंतु, कडबाकुट्टीचा वापर न करता तशीच वैरण जनावरांना टाकली जाते. परिणामी जनावरांच्या शेणमूत्रामुळे वैरण खराब होते. त्यामुळे वैरण पिकांचे उत्पादन वाढवून आणि अधिकाधिक वैरणीची योग्य प्रकारे साठवणूक करून दिवसेंदिवस होत असणारी वैरणीची तूट भरून काढावी लागणार आहे. त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी केले आहे.शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, फळे आदी विक्रीसाठी शहरात जात असल्यामुळे त्यांचा टाकाऊ भाग वैरण म्हणून उपयोगात न येता शहराच्या कचरा कुंडीत जमा होत आहे. तसेच गावातील सामायिक जमीन, गायरान, देवराई आदीमध्ये अतिक्रमण वाढले आहे. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आगीमुळे गवताच्या व कडब्यांच्या गंज्यांना आग लागून नुकसान होत आहे. 

टॅग्स :Puneपुणे