शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

बदल्यांसाठी बनावट कागदपत्रे; संवर्ग १, २ आणि ४ ची बनावट पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 5:59 AM

राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता.

- निनाद देशमुखपुणे : राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता. हा अर्ज भरताना शहरालगतच्या तसेच चांगल्या ठिकाणच्या शाळा मिळवण्यासाठी काहींनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्य शासनानेही याची गंभीर दखल घेतली असून, अशा शिक्षकांच्या कागत्रपत्रांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.बदल्यांमधील घोळ कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे या वर्षी आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेचा जिल्ह्यातील जवळपास बाराशे शिक्षकांना फटका बसला आहे. ५ हजार ३८८ शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांपैकी सुमारे ६५५ शिक्षक विस्थापित झाले आहेत.याबरोबरच, शिक्षकांसह पती-पत्नी एकत्रीकरण, पसंतीच्याविरोधात मिळालेल्या शाळा अशा अनेक त्रुटी या बदली प्रक्रियेत राहिल्या आहेत. मात्र, काही शिक्षकांनी चांगल्या शाळा मिळाव्या यासाठी संवर्ग १, २, व ४ मधील शिक्षकांच्या बनावट प्रमाणपत्र व बनावटमाहिती सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. विस्थापित शिक्षकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये या शिक्षकांची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीत काही शिक्षकांनी चुकीची प्रमाणपत्रे सादर करून चांगल्या ठिकाणी बदल्या मिळवल्याच्या तक्रारी केल्या. बदल्यांच्या पहिल्या फेरीत गुगल मॅपचा चुकीच्या पद्धतीने वापर करून संवर्ग २ मधील पती आणि पत्नी यांनी ३० कि.मी.च्या आत गुगल मॅपिंगद्वारे दाखूनही बनावट प्रमाणपत्राद्वारे बदली मागितली. ही बदली मागताना ३० कि.मी.च्या बाहेरचे गाव मागत सूट मिळवली. काहींनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून तसेच कुमारिका विधवा परित्यक्ता असल्याचे भासवून बदली प्रक्रियेचा चुकीचा लाभ घेतला. संवर्ग ४मध्ये माहिती भरताना जिल्ह्याबाहेरील शिक्षकांनी जिल्ह्यातील रुजू तारीख न लिहिता ते ज्या जिल्ह्यातनोकरीला लागले तेथील तारीख लिहिल्याने आधीपासून सेवेने जास्त असणाऱ्या शिक्षकांना त्याचा फटका बसला आहे.या तक्रारींची शासनानेही गंभीर दखल घेतली आहे. ज्या ठिकाणी शिक्षक रुजू होणार आहेत, त्या ठिकाणी रुजू होण्याआधी त्यांच्या सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार आहे. यात दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर होणार छाननीशिक्षकांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरावर पुन्हा कागत्रपत्रे तपासण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे तसे पत्र आज देण्यात येणार आहे. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. जिल्हा परिषदेकडे दोन तालुक्यांत तक्रारींचे ३ अर्ज आले आहेत.शिक्षकांच्या आॅर्डर निघाल्या आहेत. ते रुजू होताना त्यांच्या अर्जांची छाननी गट शिक्षणाधिकाºयांद्वारे करण्यात येणार आहे. तक्रारी जरी आल्या असल्या तरी तपासणीदरम्यान असले काही प्रकार आढळल्यास थेट शासनानेच कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसे पत्रही जिल्हा परिषदेला मिळाले असून, असे बोगस शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. - सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Teacherशिक्षक