शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

श्रद्धेचा केवळ बुरखा पांघरलाय - वैभव मांगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 03:36 IST

‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात.

पुणे : ‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. आज कुठल्याही मोठ्या देवस्थानचे ट्रस्टी हे सर्व नास्तिक लोक आहेत. अशा लोकांनी फक्त श्रद्धेचा बुरखा पांघरलेला आहे,’ असे परखड मत अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केले. शहीद भगतसिंग विचार मंचातर्फे आयोजित सहाव्या नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते.‘अज्ञान मान्य करणे हा विज्ञानाचा आधार आहे. धर्म मात्र अज्ञानच मान्य करायला तयार नाही. ज्या देवस्थानाला मोठमोठे व्यापारी लोक जातात आणि पार्टनरशिपमध्ये बोली लावतात, ते देवाला चालतं का? जीवनातील प्रत्येक गोष्टीत तर्क असतो. तो शोधायला आपण लोकांना प्रवृत्त केले पाहिजे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर, इतिहास अभ्यासक डॉ. टी. एस. पाटील, अभ्यासक य. ना. वालवनकर या वेळी उपस्थित होते.गाय मारली म्हणून माणसाची हत्या...मांगले म्हणाले, ‘आज आपण खूप असहिष्णू होत चाललो आहोत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दाभोलकरांची हत्या होते. तिथे आपण काहीच करू शकलो नाही आहोत. एक गाय कोणीतरी मारली, असा संशय घेऊन एका माणसाची हत्या केली जाते. ज्या गाई रस्त्यावर फिरून मिळेल ते खातात, पोटात प्लॅस्टिक अडकून त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्याविषयी यांना काहीच वाटत नाही. पण कुठल्यातरी धर्मातल्या माणसाने गाय मारली, म्हणून त्यांची हत्या केली जाते, हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे.’

टॅग्स :vaibhav mangleवैभव मांगलेPuneपुणे