शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

कारखान्यांची होणार दमछाक, शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:10 IST

हंगाम लांबण्याची शक्यता : शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

सोमेश्वरनगर : साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याचा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्याता आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण उसाचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.

राज्यातील साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निर्णयामुळे कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडणार असून गाळप हंगाम मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे आणि उसाला चांगला दर मिळत असल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच ऊसतोडणी कामगारांनीही संप पुकारला आहे. परिणामी, जादा ऊस असणाऱ्या कारखान्यांना गाळप वेळेत उरकणे अवघड होणार आहे. संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. त्यातच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सुरू होत आहे. त्याअगोदर ऊसतोडणी कामगारांचा संप मिटणे आवश्यक आहे; अन्यथा दिवाळीनंतर जर हे कामगार कारखानास्थळावर दाखल झाले, तर हंगाम अजून लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे-पाटील यांनी २७ आॅगस्ट रोजी ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन साखर संघाला दिले आहे. निवेदनात ऊसतोडणी मजुरीत दुप्पट वाढ व्हावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ व्हावी, राज्य सरकारने २०१४-१५मध्ये २० टक्क्यांची वाढ करून द्यावी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळेची सोय करावी, ऊसतोडणी कामगार व मुकादम यांना शासनाच्या कामगार विभागाची ओळखपत्रे देण्यात यावीत, ऊसतोडणीवर कामगारांना बसत आलेला टॅक्स कपात करू नये, ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी आदी मागण्यांसह १५ मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य करण्यासाठी कामगार संघटना अडून बसली आहे.हंगाम संपण्यासाठीमोठा कालावधीऊस हंगाम उशिरा सुरू करण्याच्या निर्णयामुळे गाळप हंगाम संपण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. अनेक साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १२ लाख टनांपर्यंत उसाची उपलब्धता आहे. अनेक कारखान्यांनी सक्षम ऊसतोडणी यंत्रणा उभी केली आहे. या वर्षी हार्वेस्टरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. मात्र, संप लवकर मिटला नाही, तर कारखाने नियमित सुरू होण्यासाठी ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.उसाचे वाढते क्षेत्र पाहता, मंत्री समितीने कारखाने सुरू करण्यासाठी १ आॅक्टोबरला परवानगी देणे गरजेचे होते. तसेच हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानेही ऊस लवकर जाणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगार संप लवकर मिटणे, हेही कारखाने वेळेवर सुरू होण्यासाठी आवश्यक आहे.- अशोक पवार,अध्यक्ष, घोडगंगा कारखानाअनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, कारखानदार व शासन कोणताही तोडगा काढत नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.- गहिनीनाथ थोरे-पाटीलअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटना

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने