शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कारखान्यांची होणार दमछाक, शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:10 IST

हंगाम लांबण्याची शक्यता : शासननिर्णय, तोडणी मजुरांचा संप भोवणार

सोमेश्वरनगर : साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याचा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्याता आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण उसाचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.

राज्यातील साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निर्णयामुळे कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडणार असून गाळप हंगाम मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे आणि उसाला चांगला दर मिळत असल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच ऊसतोडणी कामगारांनीही संप पुकारला आहे. परिणामी, जादा ऊस असणाऱ्या कारखान्यांना गाळप वेळेत उरकणे अवघड होणार आहे. संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. त्यातच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सुरू होत आहे. त्याअगोदर ऊसतोडणी कामगारांचा संप मिटणे आवश्यक आहे; अन्यथा दिवाळीनंतर जर हे कामगार कारखानास्थळावर दाखल झाले, तर हंगाम अजून लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे-पाटील यांनी २७ आॅगस्ट रोजी ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन साखर संघाला दिले आहे. निवेदनात ऊसतोडणी मजुरीत दुप्पट वाढ व्हावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ व्हावी, राज्य सरकारने २०१४-१५मध्ये २० टक्क्यांची वाढ करून द्यावी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळेची सोय करावी, ऊसतोडणी कामगार व मुकादम यांना शासनाच्या कामगार विभागाची ओळखपत्रे देण्यात यावीत, ऊसतोडणीवर कामगारांना बसत आलेला टॅक्स कपात करू नये, ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी आदी मागण्यांसह १५ मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य करण्यासाठी कामगार संघटना अडून बसली आहे.हंगाम संपण्यासाठीमोठा कालावधीऊस हंगाम उशिरा सुरू करण्याच्या निर्णयामुळे गाळप हंगाम संपण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. अनेक साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १२ लाख टनांपर्यंत उसाची उपलब्धता आहे. अनेक कारखान्यांनी सक्षम ऊसतोडणी यंत्रणा उभी केली आहे. या वर्षी हार्वेस्टरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. मात्र, संप लवकर मिटला नाही, तर कारखाने नियमित सुरू होण्यासाठी ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.उसाचे वाढते क्षेत्र पाहता, मंत्री समितीने कारखाने सुरू करण्यासाठी १ आॅक्टोबरला परवानगी देणे गरजेचे होते. तसेच हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानेही ऊस लवकर जाणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगार संप लवकर मिटणे, हेही कारखाने वेळेवर सुरू होण्यासाठी आवश्यक आहे.- अशोक पवार,अध्यक्ष, घोडगंगा कारखानाअनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, कारखानदार व शासन कोणताही तोडगा काढत नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.- गहिनीनाथ थोरे-पाटीलअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटना

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने