शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोकशाही दिनात फेऱ्या मारूनही मिळेना न्याय

By admin | Updated: December 9, 2015 00:31 IST

महापालिकेच्या सुविधांबाबत कुठेच न्याय न मिळाल्यास दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनामध्ये थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार करता येते.

पुणे : महापालिकेच्या सुविधांबाबत कुठेच न्याय न मिळाल्यास दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनामध्ये थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार करता येते. मात्र, या लोकशाही दिनाला अनेकदा आयुक्त उपस्थित राहत नसल्याने ४०-४० वेळा फेऱ्या मारूनही न्याय मिळत नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. महापालिकेच्या बांधकाम, आरोग्य, पथ, पाणीपुरवठा, विधी, करसंकलन, मलनि:सारण आदी अनेक विषयांबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून लोकशाही दिनामध्ये मांडल्या जातात. महापालिका आयुक्तांकडे लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्ज करण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयामध्ये दर महिन्या तिसऱ्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनामध्ये निवेदन द्यावे लागते. तिथे एका महिन्याच्या कालावधीमध्ये तक्रारदाराचे समाधान न झाल्यास त्यांना आयुक्तांकडील लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येतो. दोन्ही ठिकाणी लोकशाही दिनापूर्वी किमान १५ दिवस अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. इतके सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार करण्याची संधी मिळते. मात्र, या लोकशाही दिनाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याने अनेकदा न्याय मिळत नसल्याचे दिसून येते. सजग नागरिक मंचाने सोमवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये नागरिकांशी याबाबत संवाद साधला असता अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत.सोमवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये ८७ जणांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. लोकशाही दिनास आयुक्त उशिरा आले. त्यांच्यापैकी एका तक्रारदाराने ४० वेळा फेऱ्या मारूनही त्याची तक्रार सोडविली गेली नसल्याची कैफियत मांडली. ३ तक्रारदारांनी १५ वेळा फेऱ्या मारल्याचे सांगितले. १४ तक्रारदारांनी लोकशाही दिनामध्ये येण्याची दहावी वेळ असल्याचे सांगितले. १२ जणांनी १ ते ३ वेळा फेऱ्या मारल्या असल्याची माहिती दिली. बहुतांश लोकशाही दिनांना आयुक्त उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे लोकशाही दिनाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. लोकशाही दिनामध्ये दिलेल्या निर्णयावर अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जात नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. जनतेला आरोग्य योजनांची माहिती व्हावी म्हणून लावलेले फलकही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून टाकल्याची तक्रार लोकशाही दिनामध्ये करण्यात आली.सोमवारीच्या लोकशाही दिनामध्ये अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण विभागाच्या १८, संपादित जमिनीचा मोबदला नसल्याच्या २, आरोग्य साफसफाईच्या २, पथ विभागाच्या (रस्ते नाही) २, नाल्यांवर बांधकामाच्या २ व विधी विभाग/ सेवक वर्ग/ करसंकलन विभागाशी संबंधित ४ तक्रारी दाखल झाल्या. जमिनीवर बसून घेतला सहभागलोकशाही दिनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाकडून खुर्च्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जनतेचे सेवक असलेले सर्व अधिकारी खुर्च्यावर व जनता मात्र जमिनीवर, असे चित्र महापालिकेच्या लोकशाही दिनामध्ये बघायला मिळाले. लोकशाही दिनाबाबत महापालिका प्रशासनाची ही बेफिकिरी पाहून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे त्यांनी तीव्र शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.जिल्ह्यातही स्थिती वाईट; अधिकारी अनुपस्थितपुणे : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा, तालुका स्तरावर नियमितपणे लोकशाही दिनाची अंमलबजावणी केली जाते खरी; पण या बैठकीसाठी अनेक वेळा प्रमुख अधिकारीच अनुपस्थिती असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. त्यात तक्रार दाखल करूनदेखील योग्य न्याय मिळेलच, याची खात्री नसल्याने तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या वर्षभरात केवळ ४२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.शासनाने तालुका लोकशाही दिनासाठी तहसीलदार अध्यक्ष व जिल्हा स्तरावर लोकशाही दिनासाठी जिल्हाधिकारी स्वत: अध्यक्ष असतील. महिन्यातून एक वेळा होणाऱ्या या लोकशाही दिनासाठी ९० टक्के वेळा अध्यक्ष उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारी दाखल करूनदेखील न्याय मिळेलच याची अपेक्षा नाही. सरकारीदरबारी अनेक हेलपाटे मारून न्याय मिळाला नाही, तर जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिक लोकशाही दिनात दाद मागतात; पण तेथेदेखील त्यांना न्याय दिला जात नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान, शासनाने लोकशाही दिनामध्ये कोणत्या स्वरूपाच्या तक्रारींचे अर्ज स्वीकारावेत अथवा नाही, याबाबत स्पष्ट गाईडलाईन दिल्या आहेत. परंतु, सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनासाठी येणाऱ्या तक्रारी अर्जांमध्ये सातबाऱ्यावर नोंद दाखल केली जात नाही, चुकीची नोंद केली, एखाद्या कर्मचाऱ्याने काम न केल्यास त्याला निलंबित करावे अशा स्वरूपाच्या तक्रारी अधिक आहेत. यातील अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांच्या आस्थापना व न्यायप्रविष्ट स्वरूपाच्या आहेत. यामुळे यावर अंतिम निर्णय होत नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित तहसीलदारांनी सांगितले.(प्रतिनिधी)