शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

राष्ट्रवादाची अतिरेकी भावना घातक : दलाई लामा; ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 6:45 PM

एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन दलाई लामा यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देआधुनिक शिक्षण ही काळाची गरज : अध्यात्मिक गुरू दलाई लामाशिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगीकारले पाहिजे : डॉ. अनिल काकोडकर

पुणे : कोणत्या धर्माचे पालन करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यावरून व्यक्ती व्यक्तींमध्ये द्वेषाची भावना निर्माण होणे हे मानवजातीच्या हितासाठी पोषक नाही. राष्ट्रवादाची अतिरेकी भावना ही भविष्यासाठी घातक आहे. धार्मिक शिकवणीच्या आधारावर कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. म्हणूनच धर्माची शिकवण दूर सारून आधुनिक शिक्षण ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले.एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन दलाई लामा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड,आदी मान्यवर उपस्थित होते.दलाई लामा म्हणाले, की धर्म वेगवेगळे असले, तरी प्रत्येक धर्माची  शिकवण एकच आहे. प्रेम, सहिष्णुता आणि दयाभाव याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. परंतु, धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे आज द्वेष आणि तिरस्काराची भावना नागरिकांमध्ये रुजली आहे. जगभरातील विविध देशांत धार्मिकतेवरुन वाद उद्भवत आहेत. अशावेळी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी शिक्षणातून मानवतावाद आणि आपण सर्व मानव एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. सहिष्णुता, प्रेम याचा प्रसार जनमानसात करायला हवा. पैसा आणि प्रसिद्धी यापलिकडे जाऊन आजच्या शिक्षणपद्धतीने नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि सदभाव शिकविला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षणपद्धती सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने स्वत: पासून सुरुवात करुन योगदान दिले पाहिजे.डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, की आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. टेक्नोसॅव्ही पिढी ज्या वेगाने धावते आहे, त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगीकारले पाहिजे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाणघेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्रउभारणीचा वेगही वाढेल. त्यासाठी संशोधनात्मक शिक्षणपद्धतीचे वातावरण तयार केले पाहिजे.यावेळी शै़क्षणिक क्षेत्रातील योगदानाबददल आयआयटीच्या थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक, समन्वयक आणि सल्लागार कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, मुंबईच्या आयआयटीचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी सहस्त्रबुद्धे आणि कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाVishwanath Karadविश्वनाथ कराडPuneपुणे